मनमाड (विशेष प्रतिनिधी):- सुमारे तीन दशकांपासून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून मनमाड शहरात प्रसिद्ध होणाऱ्या ‘मनमाड ठिणगी’ ने काल गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर डिजिटल विश्वात पदार्पण केले.
सुमारे तीन दशकांपासून नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडणाऱ्या ‘मनमाड ठिणगी’ वर यावेळी मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला तसेच डिजिटल माध्ययमातून देखील ‘ठिणगी’ तेवढ्याच प्रखरतेने काम करेल, असा विश्वासही व्यक्त केला. शहरातील राजकीय, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी प्रत्यक्ष भेट देऊन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.












