loader image
[ays_poll id=7]

योजना सुरू करण्याचे श्रेय घेता, मग बंद करण्याचे श्रेय घेणार का?

Sep 11, 2021


नितेश राणे यांचा मुख्यमंत्र्यांना प्रश्‍न

मुंबई : कोरोना काळात आघाडी सरकारने आपल्या कार्यकर्तृत्वाचे गोडवे गायिले, पण जे खरे कोव्हिड योद्धे आहेत, त्यांच्या आरोग्याच्या प्रश्‍नाचं काय? वैद्यकीय गटविमा योजना 2017 पासून बंद आहे. ही योजना सुरु केली तेव्हा वर्तमानपत्रात बातम्या आल्या की 5 लाखापर्यंत विमा कवच दिले जार्इल. आता ही योजना बंद पडली आहे, त्यामुळे जर तुम्ही योजना सुरु करण्याचं श्रेय घेत असाल तर बंद पडल्याचं श्रेय कोण घेणार? असा प्रश्‍न भाजप आ. नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एका पत्राद्वारे विचारला आहे.

नितीन राणे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, मुंबई महापालिकेचे कार्यरत कामगार व कर्मचारी तसेच अधिकारी आणि 1 एप्रिल 2011 सालापासून सेवानिवृत झालेले कर्मचारी यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी वैद्यकीय गटविमा योजना सुरू केली होती. 1 ऑगस्ट 2015 साली ही योजना सुरू झाली. या योजनेसाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीची नियुक्तीही करण्यात आली होती. सुरुवातीला 2015-16 व 2016-17 या दोन वर्षाच्या कालावधीत ही योजना सुरु होती. परंतु सन 2017-18 या तिसऱ्या वर्षात 01ऑगस्ट 2017 ला बंद करण्यात आली. जी आजवर सुरु झालेली नाही.

आपल्या हस्ते शुभारंभ केलेली ही योजना आपल्यालाच सत्ताधारी पक्षाच्या उदासिनतेमुळे बंद झाली, त्यामुळे आता आपणास स्मरण करून देण्याची वेळ आली आहे. सदरची योजना पुन्हा कार्यान्वित होईल, या आशेवर कर्मचाऱ्यांनी स्वत: विमा काढलेला नाही. जर ही योजना पुन्हा कार्यान्वित करण्याची मानसिकता नसेल किंबहुना या योजनेचा लाभ कायमचा बंद करण्याचा निर्णय आपल्यालाच सत्ताधारी पक्षाने घेतला असेल तर त्याप्रकारे त्याची जाहीर घोषणा करून टाकावी. जेणेकरून कर्मचारी स्वत: विमा काढतील. पण त्यांच्या भावनांशी आणि त्यांच्या परिवारच्या भविष्याशी सत्ताधारी पक्षाने स्वताच्या अर्थकारणासाठी खेळू नये.
जेंव्हा ही योजना सुरु केली तेंव्हा याचे श्रेय आपण व आपल्या पक्षाने घेतले होते.आम्ही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाच लाखांपर्यंतच्या विम्याचे कवच दिले, अशाप्रकारच्या बातम्या वृत्तपत्रातून तसेच इतर माध्यमातून प्रकाशित केल्या. मग जेंव्हा ही योजना बंद झाली आहे, तर मग याचे श्रेय कुणाला द्यायचे? आपण आणि आपला महापालिकेतील सत्ताधारी पक्ष जसे ‘करून दाखवले’चे श्रेय घेतात, त्याचप्रमाणे ‘बंद करून दाखवले’ याचेही श्रेय घेणार का?


अजून बातम्या वाचा..

पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध मनमाड मराठी पत्रकार संघाने केला निषेध

पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध मनमाड मराठी पत्रकार संघाने केला निषेध

पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना सत्ताधारी गटाच्या लोकप्रतिनीधीच्या कार्यकर्त्यांकडून बेदम...

read more
शिक्षणाला जोड मेहनतीची – मनमाड च्या सुशील पवारने अमेरिकेत शिष्यवृत्तीच्या जोरावर शिक्षण घेत मिळविला बेस्ट  आऊट स्टँडींग अवॉर्ड

शिक्षणाला जोड मेहनतीची – मनमाड च्या सुशील पवारने अमेरिकेत शिष्यवृत्तीच्या जोरावर शिक्षण घेत मिळविला बेस्ट आऊट स्टँडींग अवॉर्ड

अनेकांनी स्वप्न पाहिलेले असते की परदेशात जाऊन शिक्षण घ्यावं मात्र हे स्वप्न सत्यात उतरवणे...

read more
बघा व्हिडिओ – रायपूर गावातील शिव रस्ता केला ग्रामस्थांनी बंद – अतिक्रमण हटवून मोजणी करण्याची गावकऱ्यांची मागणी

बघा व्हिडिओ – रायपूर गावातील शिव रस्ता केला ग्रामस्थांनी बंद – अतिक्रमण हटवून मोजणी करण्याची गावकऱ्यांची मागणी

चांदवड तालुक्यातील रायपूर येथील शीव रस्ता शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने बालवाडी तसेच चिमुकल्यांना...

read more
‘अमृत भारत स्थानक योजना’ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील रेल्वेस्थानके चमकणार : डॉ. भारती पवार देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते V .C. द्वारे होणार उद्घाटन

‘अमृत भारत स्थानक योजना’ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील रेल्वेस्थानके चमकणार : डॉ. भारती पवार देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते V .C. द्वारे होणार उद्घाटन

केंद्र सरकारमार्फत रेल्वे मंत्रालयाच्या वतीने अमृत भारत (Amrut Bharat) स्टेशन योजनेतून भुसावळ...

read more
भूमी अभिलेख खात्यातील अजून एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

भूमी अभिलेख खात्यातील अजून एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

नाशिक जिल्ह्यातील प्रशासनातील लाचखोर अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात टिपले जात असून...

read more
.