loader image
[ays_poll id=7]

योजना सुरू करण्याचे श्रेय घेता, मग बंद करण्याचे श्रेय घेणार का?

Sep 11, 2021


नितेश राणे यांचा मुख्यमंत्र्यांना प्रश्‍न

मुंबई : कोरोना काळात आघाडी सरकारने आपल्या कार्यकर्तृत्वाचे गोडवे गायिले, पण जे खरे कोव्हिड योद्धे आहेत, त्यांच्या आरोग्याच्या प्रश्‍नाचं काय? वैद्यकीय गटविमा योजना 2017 पासून बंद आहे. ही योजना सुरु केली तेव्हा वर्तमानपत्रात बातम्या आल्या की 5 लाखापर्यंत विमा कवच दिले जार्इल. आता ही योजना बंद पडली आहे, त्यामुळे जर तुम्ही योजना सुरु करण्याचं श्रेय घेत असाल तर बंद पडल्याचं श्रेय कोण घेणार? असा प्रश्‍न भाजप आ. नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एका पत्राद्वारे विचारला आहे.

नितीन राणे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, मुंबई महापालिकेचे कार्यरत कामगार व कर्मचारी तसेच अधिकारी आणि 1 एप्रिल 2011 सालापासून सेवानिवृत झालेले कर्मचारी यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी वैद्यकीय गटविमा योजना सुरू केली होती. 1 ऑगस्ट 2015 साली ही योजना सुरू झाली. या योजनेसाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीची नियुक्तीही करण्यात आली होती. सुरुवातीला 2015-16 व 2016-17 या दोन वर्षाच्या कालावधीत ही योजना सुरु होती. परंतु सन 2017-18 या तिसऱ्या वर्षात 01ऑगस्ट 2017 ला बंद करण्यात आली. जी आजवर सुरु झालेली नाही.

आपल्या हस्ते शुभारंभ केलेली ही योजना आपल्यालाच सत्ताधारी पक्षाच्या उदासिनतेमुळे बंद झाली, त्यामुळे आता आपणास स्मरण करून देण्याची वेळ आली आहे. सदरची योजना पुन्हा कार्यान्वित होईल, या आशेवर कर्मचाऱ्यांनी स्वत: विमा काढलेला नाही. जर ही योजना पुन्हा कार्यान्वित करण्याची मानसिकता नसेल किंबहुना या योजनेचा लाभ कायमचा बंद करण्याचा निर्णय आपल्यालाच सत्ताधारी पक्षाने घेतला असेल तर त्याप्रकारे त्याची जाहीर घोषणा करून टाकावी. जेणेकरून कर्मचारी स्वत: विमा काढतील. पण त्यांच्या भावनांशी आणि त्यांच्या परिवारच्या भविष्याशी सत्ताधारी पक्षाने स्वताच्या अर्थकारणासाठी खेळू नये.
जेंव्हा ही योजना सुरु केली तेंव्हा याचे श्रेय आपण व आपल्या पक्षाने घेतले होते.आम्ही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाच लाखांपर्यंतच्या विम्याचे कवच दिले, अशाप्रकारच्या बातम्या वृत्तपत्रातून तसेच इतर माध्यमातून प्रकाशित केल्या. मग जेंव्हा ही योजना बंद झाली आहे, तर मग याचे श्रेय कुणाला द्यायचे? आपण आणि आपला महापालिकेतील सत्ताधारी पक्ष जसे ‘करून दाखवले’चे श्रेय घेतात, त्याचप्रमाणे ‘बंद करून दाखवले’ याचेही श्रेय घेणार का?


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – धावत्या रेल्वेत चढतांना बापलेकाचा निसटला हात, दैव बलवत्तर म्हणून वाचले प्राण – अकोला स्थानकावर घडली घटना

बघा व्हिडिओ – धावत्या रेल्वेत चढतांना बापलेकाचा निसटला हात, दैव बलवत्तर म्हणून वाचले प्राण – अकोला स्थानकावर घडली घटना

अकोला येथील रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेत चढणे एका बापलेकाला जीवावर बेतले असते, मात्र तेथे...

read more
मासिक वेतन अदा करण्यापोटी १० हजार लाचेची मागणी – महिला अधिकाऱ्यासह तिघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

मासिक वेतन अदा करण्यापोटी १० हजार लाचेची मागणी – महिला अधिकाऱ्यासह तिघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

जिल्हा हिवताप विभागातील आरोग्य सेवकाचे मासिक वेतन अदा करण्यासाठी १० हजाराची लाच स्वीकारताना महिला...

read more
मनमाड करंजवण योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू – नियोजित वेळेत काम पूर्ण करून मनमाड वासियांना दररोज मिळणार पाणी

मनमाड करंजवण योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू – नियोजित वेळेत काम पूर्ण करून मनमाड वासियांना दररोज मिळणार पाणी

करंजवण-मनमाड पाणीपुरवठा योजनेचे काम युध्दपातळीवर सुरू असून करंजवण धरणाच्या कडेला जॅकवेलचे काम...

read more
मासिक वेतन अदा करण्यापोटी १० हजार लाचेची मागणी – महिला अधिकाऱ्यासह तिघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

चांदवड तालुक्यातील बोराळे येथील सरपंच आणि कंत्राटी ग्रामसेवकाला पंधरा हजाराची लाच घेतांना एसीबी ने केली अटक

चांदवड तालुक्यातील बोराळे ग्राम पंचायतीच्या कंत्राटी ग्रामसेवकासह सरपंचाने लोखंडी जिन्याच्या...

read more
.