loader image
[ays_poll id=7]

T20 World Cup नंतर विराट कोहली कर्णधारपद सोडणार?

Sep 15, 2021


आगामी टी 20 विश्वचषक स्पर्धेनंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आपले कर्णधारपद सोडणार असल्याची चर्चा सुरु आहे. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषकानंतर विराट कोहलीने टी 20 आणि एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. त्याच्या ठिकाणी रोहित शर्माची वर्णी लागण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. कसोटी संघाचे नेतृत्व मात्र विराटने आपल्याकडेच ठेवण्याचं ठरवलं असल्याचीही माहिती आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या एका वृत्तानुसार, विराटच्या जागी रोहित शर्माकडे टी 20 आणि एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा दिली जाऊ शकते. गेल्या काही दिवसांत विराट कोहलीने या विषयावर संघ व्यवस्थापन आणि रोहित शर्मासोबत अनेकदा चर्चा केल्याची माहिती आहे. विराट कोहलीला जगातल्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक समजलं जातं. विराटने आपल्या फलंदाजीवर लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. 

विराट कोहलीकडे तीनही प्रकारचे कर्णधारपद असल्याने त्याचा परिणाम फलंदाजीवर होताना दिसत आहे. त्यामुळे त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला तर ते त्याच्या फलंदाजीसाठी चांगलं असेल असं मत काही जाणकारांनी व्यक्त केलं आहे. 

रोहित शर्मा सध्या तीनही प्रकाराच चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तसेच रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचा चषक जिंकला आहे. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये त्याला जगातला सर्वोत्तम ओपनर समजलं जातं. त्यामुळेच त्याच्याकडे कर्णधारपदाची धुरा देण्यासाठी ही योग्य वेळ आहे असं बीसीसीआयच्या सूत्रांचं मत आहे. 


अजून बातम्या वाचा..

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड व मनमाड बॉईज (क्लासिक बॉईज) यांच्या संयुक्त...

read more
बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने कॅनडाच्या मिशेल लीविरुद्ध विजय मिळवत सुवर्णपदकाला गवसणी घातली

बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने कॅनडाच्या मिशेल लीविरुद्ध विजय मिळवत सुवर्णपदकाला गवसणी घातली

कॉमनवेल्थ बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने कॅनडाच्या...

read more
खेलो इंडिया रँकिंग वेटलिफ्टींग स्पर्धेत दिया किशोर व्यवहारे ने पटकावले कांस्य पदक

खेलो इंडिया रँकिंग वेटलिफ्टींग स्पर्धेत दिया किशोर व्यवहारे ने पटकावले कांस्य पदक

नागरोटा हिमाचल प्रदेश येथे सुरू असलेल्या पहिल्या राष्ट्रीय खेलो इंडिया महिला रँकिंग वेटलिफ्टिंग...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद आहेर ची राष्ट्रीय खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद आहेर ची राष्ट्रीय खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी

जय भवानी व्यायामशाळेचा आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर याने पंचकुला हरियाणा येथे सुरू...

read more
भुसावळ डिविजन इंटरडिपार्टमेंटल क्रिकेट स्पर्धा : मनमाड पँथर ने पटकावले प्रथम बक्षीस

भुसावळ डिविजन इंटरडिपार्टमेंटल क्रिकेट स्पर्धा : मनमाड पँथर ने पटकावले प्रथम बक्षीस

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...

read more
राष्ट्रीय युथ वेटलिफ्टींग स्पर्धा :आकांक्षा व्यवहारे ठरली नाशिक जिल्ह्यातील पहिली सर्वोत्कृष्ट खेळाडू

राष्ट्रीय युथ वेटलिफ्टींग स्पर्धा :आकांक्षा व्यवहारे ठरली नाशिक जिल्ह्यातील पहिली सर्वोत्कृष्ट खेळाडू

भुवनेश्वर ओडिसा येथे 19 ते 31 मार्च दरम्यान संपन्न झालेल्या राष्ट्रीय युथ,ज्युनिअर,सिनियर...

read more
यंदाच्या IPL सामन्यांवर दहशतवादी हल्ल्याचं सावट? मुंबई पोलिसांनी दिले स्पष्टीकरण

यंदाच्या IPL सामन्यांवर दहशतवादी हल्ल्याचं सावट? मुंबई पोलिसांनी दिले स्पष्टीकरण

आयपीएल स्पर्धेचा पंधरावा सिझन 26 मार्चपासून मुंबईतून सुरू होणार आहेत. मात्र यंदाच्या आयपीएल मॅचवर...

read more
मनमाडच्या भूमी क्रिकेट अकॅडमी चा ऋषी शर्मा या खेळाडूची नाशिकच्या अंडर 14 संघात निवड

मनमाडच्या भूमी क्रिकेट अकॅडमी चा ऋषी शर्मा या खेळाडूची नाशिकच्या अंडर 14 संघात निवड

नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन याच्यातर्फे 14 वर्षा आतील खेळाडुंची जिल्हा संघासाठी डिसेंबर महिन्यात...

read more
.