loader image
[ays_poll id=7]

राज्यसभा निवडणूक – भाजपच्या माघारीने रजनी पाटील बिनविरोध !

Sep 27, 2021


काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभा निवडणुकीतून भारतीय जनता पक्षाने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या या निर्णयामुळे कॉंग्रेस उमेदवार रजनी पाटील यांची बिनविरोध निवड आता निश्चित झाली आहे.  भाजपने आता परंपरा पाळण्याचा निर्णय घेतला आहे व भाजप उमेदवार संजय उपाध्याय यांनी आपला अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी एखाद्याच्या खासदाराच्या निधनानंतर होत असलेल्या पोटनिवडणुकीत उमेदवार न देण्याची परंपरा असल्याची आठवण भाजपला करुन दिली होती. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपने उमेदवार मागे घ्यावा, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

अजून बातम्या वाचा..

स्वातंत्र्यसेनानी कॉ. माधवराव गायकवाड ध्येयनिष्ठ विचारांची धगधगती मशाल होती – भास्कर कदम

स्वातंत्र्यसेनानी कॉ. माधवराव गायकवाड ध्येयनिष्ठ विचारांची धगधगती मशाल होती – भास्कर कदम

नांदगाव : स्वातंत्र्यसेनानी, कष्टकरी खंडकरी शेतकऱ्यांचे लढवय्ये नेते कॉ. माधवराव गायकवाड...

read more
.