loader image
[ays_poll id=7]

गुलाब चक्रीवादळ – दोन दिवस महाराष्ट्रात अलर्ट !

Sep 27, 2021


पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर ‘गुलाब’ नावाच्या चक्रीवादळात झाले आहे. या चक्रीवादळाचा सर्वात जास्त तडाखा ओडिशा आणि आंध्रप्रदेश या राज्यांना बसत आहे. आंध्रप्रदेशमध्ये या चक्रीवादळामुळे 3 मच्छिमारांचा मृत्यू झाला. या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रात सुद्धा होणार आहे. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये 27 आणि 28 सप्टेंबर रोजी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

गुलाब चक्रीवादळामुळे मुंबई, ठाणे, धुळे, जळगाव, नाशिक, यासह बर्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस ते अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या चक्रीवादळामुळे जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे रेंड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचसोबत नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.या चक्रीवादळामुळे समुद्र खवळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. 


अजून बातम्या वाचा..

कंचन ज्वेलर्स आयोजित दिवाळी – नाताळ ऑफर योजनेची सोडत शेकडो ग्राहकांच्या साक्षीने संपन्न

कंचन ज्वेलर्स आयोजित दिवाळी – नाताळ ऑफर योजनेची सोडत शेकडो ग्राहकांच्या साक्षीने संपन्न

मनमाड शहरात सुमारे सात दशकांपासून शुद्धता आणि विश्वासाची परंपरा अबाधित राखत ग्राहकांच्या पसंतीस...

read more
बघा व्हिडिओ – वसतिगृहाच्या सहाव्या मजल्यावरच्या खिडकीतून पडुन विद्यार्थ्याचा मृत्यू

बघा व्हिडिओ – वसतिगृहाच्या सहाव्या मजल्यावरच्या खिडकीतून पडुन विद्यार्थ्याचा मृत्यू

सहाव्या मजल्यावरच्या खिडकीतून खाली पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना कोटा राजस्थान येथे...

read more
.