loader image
[ays_poll id=7]

३० वर्षे सत्ता असूनही मुंबईत मराठी परकीच – आमदार अमित साटम!

Oct 1, 2021


मुंबई कोणाची ? मराठी माणसाची…एकेकाळी स्व.बाळासाहेबांनी मराठी मुंबईची केलेली ओळख…आणि मुंबई कायम राजकीय पटलावर चर्चेत राहिलेले विषय. सध्या मुंबई विविध प्रकरण गाजत असून याच मुद्द्यावरून विरोधकांनी सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला धारेवर धरले आहे. गुरुवारी भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी पत्र लिहल्यानंतर आज भाजप आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. यात मुंबईत मराठी भाषेवरून मुख्यमंत्री ठाकरेंवर घणाघाती टीकाही केली आहे.

मुंबईत ३० वर्षे शिवसेनेची सत्ता असून देखील मुंबईत मराठी भाषेची अवस्था अतिशय बिकट असल्याचे साटम यांनी म्हटले आहे. शिवसेनेकडून मराठी भाषेच्या विस्तारासाठी प्रयत्न होत नसल्याचा आरोप भाजप आमदार अमित साटम यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साटम यांनी पत्र पाठवले असून त्यामध्ये त्यांनी मराठी भाषा व मराठी शालांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
 
मुंबईतून मराठी माणूस बाहेर फेकला गेला, तशीच अवस्था मराठी शाळांची आणि भाषेची झाली आहे. सण 2010-11 मध्ये मराठी शाळांची संख्या ४१३ होती आता सन २०२०-२०२१ मध्ये शाळांची संख्या फक्त २८० इतकी राहिल्याचे साटम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रातून म्हटले आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे, उच्च...

read more
भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

२०२४ कार्यशाळेचे आयोजन येवला शहरात दहा हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विजया...

read more
.