2 ऑक्टोबर रोजी होणारी तिसऱ्या टप्प्यातील अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शुक्रवारी रात्री पुढे ढकलण्यात आली आहे. आता हि प्रवेश प्रक्रिया 4 ते 5 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती असून देखील हि प्रवेश प्रक्रिया ठेवण्यात आली होती. यावर अनेक संघटनांनी आक्षेपही नोंदवले आहेत. मात्र यात 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीचा शिक्षण विभागाला विसर पडला कि काय असा प्रश्न निर्माण झाला होता, त्यावर तातडीने कार्यवाही करून प्रवेश प्रक्रियेत बदल केले जातील,
महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिनी अकरावी प्रवेश प्रक्रिया ठेऊन या प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यास दिरंगाई का करण्यात आली याविषयी माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे.











