loader image
[ays_poll id=7]

ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचं निधन

Oct 3, 2021


 

मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक दत्ताराम मारुती उर्फ द. मा. मिरासदार यांचं निधन झालं. मराठी साहित्यात विनोदी लेखन आणि कथाकथनामुळे ते वाचकप्रिय ठरले. द. मा मिरासदारांचा जन्म 14 एप्रिल 1927 रोजी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज इथं झाला. पत्रकारितेपासून त्यांनी साहित्यसेवेस सुरुवात केली.

पुण्यात काही काळ पत्रकारिता केल्यानंतरते अध्यापन क्षेत्राकडे वळले. 1961 ते 1987 या काळात औरंगाबादमधील देवगिरी महाविद्यालय आणि पुण्यातील गरवारे महाविद्यालयात त्यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केलं. 1950 मध्ये ‘सत्यकथा’ मासिकात प्रसिद्ध झालेल्या ‘रानमाणूस’ या पहिल्याच कथेपासून त्यांच्या लेखन कारकीर्दीला सुरुवात झाली.

द. मा. मिरासदारांच्या कथांमध्ये ग्रामीण भागाचं कथानक असे. कथांमधील पात्रांना ते अत्यंत विनोदी पद्धतीनं मांडत. तितकचं तीव्रतेनं ते त्या पात्रांना कथाकथनामधून प्रेक्षकांसमोर सादर करत. विनोदी लेखनासाठी प्रसिद्ध असलेल्या मिरासदारांनी स्पर्श, विरंगुळा आणि कोणे एके काळी यांसारख्या गंभीर कथाही लिहिल्या.

1998 साली परळी-वैजनाथ इथं आयोजित केलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही होते. मिरासदारांनी संवादलेखन केलेल्या ‘एक डाव भुताचा’ आणि ‘ठकास महाठक’ या दोन सिनेमांना अनेक पारितोषिके मिळाली. तसंच, महाराष्ट्र राज्याचा विंदा जीवनगौरव पुरस्कार (2015) मिळाला. प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कारानेही 2014 साली त्यांना गौरवण्यात आले होते.

 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून मिरासदारांना आदरांजली वाहिली.


अजून बातम्या वाचा..

पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध मनमाड मराठी पत्रकार संघाने केला निषेध

पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध मनमाड मराठी पत्रकार संघाने केला निषेध

पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना सत्ताधारी गटाच्या लोकप्रतिनीधीच्या कार्यकर्त्यांकडून बेदम...

read more
शिक्षणाला जोड मेहनतीची – मनमाड च्या सुशील पवारने अमेरिकेत शिष्यवृत्तीच्या जोरावर शिक्षण घेत मिळविला बेस्ट  आऊट स्टँडींग अवॉर्ड

शिक्षणाला जोड मेहनतीची – मनमाड च्या सुशील पवारने अमेरिकेत शिष्यवृत्तीच्या जोरावर शिक्षण घेत मिळविला बेस्ट आऊट स्टँडींग अवॉर्ड

अनेकांनी स्वप्न पाहिलेले असते की परदेशात जाऊन शिक्षण घ्यावं मात्र हे स्वप्न सत्यात उतरवणे...

read more
बघा व्हिडिओ – रायपूर गावातील शिव रस्ता केला ग्रामस्थांनी बंद – अतिक्रमण हटवून मोजणी करण्याची गावकऱ्यांची मागणी

बघा व्हिडिओ – रायपूर गावातील शिव रस्ता केला ग्रामस्थांनी बंद – अतिक्रमण हटवून मोजणी करण्याची गावकऱ्यांची मागणी

चांदवड तालुक्यातील रायपूर येथील शीव रस्ता शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने बालवाडी तसेच चिमुकल्यांना...

read more
‘अमृत भारत स्थानक योजना’ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील रेल्वेस्थानके चमकणार : डॉ. भारती पवार देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते V .C. द्वारे होणार उद्घाटन

‘अमृत भारत स्थानक योजना’ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील रेल्वेस्थानके चमकणार : डॉ. भारती पवार देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते V .C. द्वारे होणार उद्घाटन

केंद्र सरकारमार्फत रेल्वे मंत्रालयाच्या वतीने अमृत भारत (Amrut Bharat) स्टेशन योजनेतून भुसावळ...

read more
भूमी अभिलेख खात्यातील अजून एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

भूमी अभिलेख खात्यातील अजून एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

नाशिक जिल्ह्यातील प्रशासनातील लाचखोर अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात टिपले जात असून...

read more
.