loader image
[ays_poll id=7]

रेल्वे उड्डाणपुलाचे नूतनीकरण करण्याची मनमाड शहर भा. ज. पा ची मागणी

Oct 3, 2021


मनमाड शहर भाजपा च्या वतीने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांना मनमाड शहरातून गेलेल्या राज्य महामार्ग क्रमांक 10 (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 जी) च्या दुरावस्थे संदर्भात तक्रार व शहरातील रेल्वे उड्डाण पुलाचे नूतनीकरण करण्याची मागणी‼️

मनमाड शहर भाजपा च्या वतीने केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री  नितीनजी गडकरी यांची केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री  डॉ भारतीताई प्रवीण पवार यांचे नेतृत्वाखाली भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितिन पांडे, पंकज खताळ, भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी मनमाड भाजपा संगठन सरचिटणीस नितीन परदेशी यांचे शिष्टमंडळाने संवाद करून मनमाड शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक 10 ( राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 जी) यांचे दुरावस्थे संदर्भात तक्रार केली व या संदर्भात दोषीची चौकशी होऊन कार्यवाही ची मागणी देखील करण्यात आली आणि याच महामार्ग वर असलेल्या रेल्वे उड्डाण पुलाचे नूतनीकरण करणे बाबत मागणी ही शहर भाजपा च्या वतीने या प्रसंगी करण्यात आली मनमाड शहराच्या मध्यवर्ती भागातून राज्य महामार्ग क्रमांक 10 हाच महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 जी म्हणून देखील ओळखला जातो या महामार्गावर मनमाड शहरातील सहा शाळा मनमाड बस स्थानक ,मनमाड उपजिल्हा रुग्णालय, विविध धर्मीय ची धार्मिक प्रार्थना स्थळे आहेत गेल्या 5 ते 7 वर्षा पासून या महामार्ग ची प्रचंड दुरवस्था झाली आहे मनमाड शहर तसेच या महामार्ग वरील रेल्वे उड्डाण पूल येथे या महामार्ग दुरावस्थे मूळे झालेल्या रस्ते अपघाता मूळे शेकडो निरपराध नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत सध्या या महामार्ग च्या दुरुस्ती साठी भाजपा सह अनेक राजकीय पक्ष सामाजिक संघटना नी मोठी जन आंदोलने केली परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची स्थायी दुरुस्ती करण्यात आलेली नाही तात्पुरते स्वरूपात डागडुजी करून वेळ मारून नेण्या चा प्रकार सातत्याने घडत आहे मनमाड कोपरगाव इन्फ्रास्ट्रक्चर टोल प्रा.लिमिटेड ही खाजगी कंत्राटदार कंपनी नागपूर ह्या महामार्ग चे देखभाल /देखरेखी चे कार्य बघत आहे य परंतु ह्या कंपनी च्या बेजबाबदार व हलगर्जीपणा पणा मुळे अनेकांनचे प्राण घेतले आहेत या कंपनीचे अधिकारी कर्मचारी दादागिरी ने वागतात आणि सर्व सामान्य नागरिकांन च्या तक्रारी कडे दुर्लक्ष करतात तसेच याच महामार्ग वर मनमाड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी रेल्वे उड्डाण पूल आहे या उड्डाण पुलाची देखील अत्यंत दुरवस्था झाली आहे हा उड्डाण पूल जुना असून त्यांचे बांधकाम ची मुदत संपली आहे यांचे कोणत्याही प्रकारे बांधकाम ऑडिट झालेले नाही त्यामुळे या रेल्वे उड्डाण पुलावर कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे याची गंभीरता देखील रस्ते प्रशासन व या देखभाल कंपनी ला नाही मनमाड शहर भाजपा वतीने गंभीर समस्या कडे आदरणीय नितीनजी गडकरी यांचे मनमाड भाजपा पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले आणि या मनमाड शहरा च्या अंतर्गत मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गक्रमांक 752 जी राज्य महामार्ग क्रमांक 10 च्या दुरावस्थे ची उच्चस्तरीय चौकशी करुन संबंधित रस्ते प्रशासन व या महामार्ग च्या देखभाल कंत्राटदार कंपनी वर कडक कार्यवाही करावी अशी मागणीही केली तसेच या महामार्ग वर असणाऱ्या रेल्वे उड्डाण पुलाचे त्वरित बांधकाम ऑडिट करून या उड्डाण पुलाचे आपले केंद्रीय मंत्रालयाचे माध्यमातून नव्याने नूतनीकरण करण्यात यावे अशी ही मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आदरणीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी अत्यंत गंभीरतेने ही समस्या/मागण्या ऐकून घेतल्या मनमाड शहरातून जाणाऱ्या या महामार्ग ला पर्याय म्हणून आगामी काळात बायपास महामार्ग ( शहारा बाहेरून )करण्याचे संकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या संवाद मध्ये दिले या केंद्रीय मंत्री गडकरी यांचे शी झालेल्या या संवाद मध्ये केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्री आदरणीय डॉ सौ भारतीताई पवार भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे,पंकज खताळ मनमाड शहर भाजपा अध्यक्ष जयकुमार फुलवाणी भाजपा मनमाड शहर संघटन सरचिटणीस नितीन परदेशी यांनी सहभाग घेतला.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.