येत्या 7 ऑक्टोबरपासून राज्यात नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. मात्र, कोरोनाचं संकट कायम असल्याने गृहविभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नियमांचे पालन करून नवरात्रौत्सव साजरा करण्यास परवानगी दिली आहे. देवींच्या मिरवणुकांपासून ते रावन दहनापर्यंतच्या अनेक बाबींवर कोर्टाने यावेळी भाष्य केलं आहे.
बघा काय आहे मार्गदर्शक तत्त्व?
१) सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांनी महापालिका तसेच स्थानिक प्रशासनाची त्यांच्या धोरणानुसार योग्य पद्धतीने पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
3) देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळांसाठी 4 फुटांची, तर घरगुती देवीच्या मूर्तीची उंची 2 फुटांचीच असावी.
4) गरबा, दांडिया आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत. त्यांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य द्यावे. या द्वारे मलेरिया, डेंग्यू असे आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय, तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी.
5) देवीच्या मंडपामध्ये प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या बाबतीत राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
6) आरती, भजन, किर्तन आणि इतर धार्मिक कार्यक्रम आयोजिक करताना गर्दी होणार नाही, तसेच ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे आणि तरतुदींचे पालन करण्यात यावे.
7) देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी.
८) लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील किंवा इमारतीतील सर्व घरगुती देवीच्या मूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये.
९) दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून करावा. रावण दहनासाठी आवश्यक तेवढ्या किमान व्यक्तीच कार्यक्रमस्थळी हजर राहतील. या कार्यक्रमाला प्रेक्षकांना बोलावू नये. त्यांना थेट प्रक्षेपणाद्वारे अथवा फेसबुक द्वारे बघण्याची व्यवस्था करावी.












