loader image
[ays_poll id=7]

धम्म,श्रामनेर शिबरातून मानवी मन मेंदू चिक्तीत्सक व उदबोधित होतो – नामदेव पगारे

Oct 5, 2021


 

येवला : तथागत बुद्धाने जगाला जीवनाचा सम्यक मार्ग दिला असून सत्य,शांती,मानवता,अहिंसा,शील,प्रज्ञा,करुणा, दया,क्षमा या मूल्यांच्या सोबत समता,स्वातंत्र्य, न्याय तत्व सांगून आर्य अष्टांगिक मार्गाचा स्वीकाराचा अडीज हजार वर्षाहून अधिक काळ आधी दिलेला धम्म आजच्या आधुनिक युगात हि काळ सुसंगत आहे.मानवी दुःखाच्या मुळाशी जाऊन बुद्ध धम्म माणसास जीवनाचा आदर्श असा सम्यक जीवन मार्ग देतो तेच धम्म शिक्षण भारतीय बौद्ध महासभा जनतेस देण्याचा गेली साठ-सत्तर वर्ष प्रयत्न करत असून धम्म,श्रामनेर शिबरातून मानवी मन मेंदू चिक्तीत्सक व उदबोधित होतो असे मत नामदेव पगारे यांनी धर्मांतर घोषणेचा ८६ व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा,मुक्तीभूमी प्रतिष्ठान येवला आयोजित श्रामनेर शिबिराचे उदघाटन करते वेळी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येवला तालुका भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष भाऊसाहेब जाधव हे होते..भन्ते दीपंकर (चैत्यभूमी) यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्तीभूमी येथे दहा दिवसीय श्रामनेर शिबिरास येथे प्रारंभ झाला आहे.
श्रामनेर शिबीरातील धम्म श्रामनेर होणे हा नवा जन्मच आहे असे मत भारतीय बौद्ध महासभेचे पूर्व जिल्हा अध्यक्ष गौरव पवार यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय शिक्षक उत्तम प्रधान (इंदोर,मध्यप्रदेश),राजू जगताप (जिल्हा सरचिटणीस),गौरव पवार(जिल्हा अध्यक्ष पूर्व जिल्हा),सतिष गांगुर्डे, विजय गांगुर्डे,मनोज गाढे,रत्नाकर साळवे,कृष्णाजी सोनवणे,अरुण जाधव,वाल्मिकी कापडे,भाऊसाहेब जाधव,संजय पगारे,मुक्ती महोत्सव समितीचे प्रवर्तक-निमंत्रक प्रा.शरद शेजवळ आदी मान्यवर उपस्थित होते.
दिनांक ४ ते १३ ऑक्टोबर २०२१ दरम्यान दहा दिवस चालणाऱ्या ह्या शिबिराच्या माध्यमातून बुद्ध धम्मचा इतिहास,वर्तमान,भविष्यकाळ या बद्दल नामवंत मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.कार्यक्रमात चे प्रास्ताविक राजू जगताप,सूत्र संचालन प्रकाश जगताप,आभार तालुका सचिव दीपक गरुड यांनी मानले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी तालुका अध्यक्ष भाऊसाहेब जाधव,भाऊसाहेब झालटे,भगवान साबळे,बाबुराव पगारे,रामा केदारे,रवी सोनवणे,बाळासाहेब निकम,रामा कोळगे,रघुनाथ पगारे,सचिन पगारे,वसंत घोडेराव,सुभाष निकम,रामदास निकम,पोपट खंडांगळे प्रयत्नशील आहेत.


अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालय आयोजित निबंध स्पर्धेला शालेय विध्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद :578 विध्यार्थ्यांनी घेतला उस्फुर्त सहभाग

मनमाड सार्वजनिक वाचनालय आयोजित निबंध स्पर्धेला शालेय विध्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद :578 विध्यार्थ्यांनी घेतला उस्फुर्त सहभाग

मनमाड - मनमाड सार्वजनिक वाचनालय तर्फे स्व.लोकमान्य टिळक यांच्या 168 व्या जयंती तथा व स्व.अण्णाभाऊ...

read more
मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेला रेल प्रबंधक श्रीमती इती पांडे यांची भेट

मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेला रेल प्रबंधक श्रीमती इती पांडे यांची भेट

प्रतिनिधी मनमाड - येथील मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेमध्ये मंडळ श्रीमती इती पांडे...

read more
राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

  नांदगांव : मारुती जगधने महाराष्ट्र राज्यशासनाने ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड -मनमाड शहाराचे सांस्कृतिक सामाजिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे ही ब्रीद वाक्य...

read more
.