येवला :
मानवी जीवनात शिक्षण-शाळांचे महत्व कधी नव्हे इतके जगाला कळाले आहे.महाराष्ट्र तथा देशातील शाळा महाविद्यालय मार्च २०२० पासून आजवर शाळा बंद राहिल्या आहेत. ऑनलाईन शाळा अभ्यासाचा पुरता बोजवारा उडाला होता अशा वेळी दिनांक ४ सप्टेंबर २०२१ पासून शहरातील इयत्ता आठवी ते बारावी व ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी इयत्तेचे वर्ग प्रत्यक्ष (ऑफलाईन) स्वरूपात उघडण्याची आनंदवार्ता असली तरी आता शहरी व ग्रामीण भागातील अंगणवाडी (प्ले ग्रुप वगळता) प्राथमिक शाळा पासून सर्व शाळा महाविद्यालय सरसकट उघडव्यात व आयुष्याची वीस वर्षेहून अधिक काळ विणावेतन काम करणाऱ्या विनाअनुदानित शाळा-वर्ग तुकड्यावर कार्यरत शिक्षकांना विनाअट सरसकट १००% अनुदान द्यावे असे आवाहन राष्ट्रीय बालक-विद्यार्थी, पालक,शिक्षक,शिक्षण-प्रशिक्षण संस्था अध्यापकभारतीच्या वतीने सरकारला निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
निवेदनावर सुभाष वाघेरे,शैलेंद्र वाघ,महेंद्र गायकवाड,अमीन शेख,मिलिंद गुंजाळ,संतोष बुरंगे, प्रा.मिलिंद गांगुर्डे,वनिता सरोदे-पगारे,भारती बागुल,अतुल डांगळे,दीपक शिंदे,कुलदिप दिवेकर,सागर पगारे,प्रा.के.एस.केवट,प्रा.नितीन केवट आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.












