loader image
[ays_poll id=7]

T20 World Cup – 4 खेळाडूंवर टांगती तलवार!

Oct 6, 2021


टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा 8 सप्टेंबरलाच झाली होती. IPL 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातील काही खेळाडूंच्या खराब फॉर्ममुळे निवडकर्त्यांना संघात बदल करण्यास भाग पाडले आहे. ICCच्या नियमांनुसार सर्व देश 10 ऑक्टोबरपर्यंत संघात बदल करू शकतात. म्हणजेच बीसीसीआयकडे आता थोडाच वेळ शिल्लक आहे. टी 20 वर्ल्ड कप 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

टी 20 वर्ल्ड कप जवळ येत असल्याने टीम इंडियाचे टेन्शन वाढलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सामना हातून गमवल्यानंतर आता टी 20 वर्ल्ड कप टीम इंडियासाठी जिंकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कोहली कर्णधार असताना टीम इंडिया एकही ट्रॉफी आतापर्यंत जिंकू शकली नाही. तर कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा शेवटचा टी 20 वर्ल्ड कप असणार आहे.

विराट कोहलीने टी 20 फॉरमॅटमधून कर्णधारपदावरून पायउतार होणार असल्याची घोषणा केली होती. त्याने ट्वीट करून ही माहिती दिली होती. टी 20 वर्ल्ड कप 2021 UAE मध्ये 17 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताला आपला पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. 

ICCच्या नियमांनुसार, भारताला अजूनही 10 ऑक्टोबरपर्यंत टी -20 वर्ल्ड कप संघात बदल करण्याची संधी आहे. वरुण चक्रवर्तीला दुखापतीमुळे टी -20 वर्ल्ड कपच्या संघातून त्याला वगळलं जाण्याची शक्यता आहे. तर त्याच्या जागी लेगस्पिनर युजवेंद्र चहलला टी -20 वर्ल्ड कप संघात संधी दिली जाण्याची शक्यता आहे. 

हार्दिक पांड्या फिटही नाही आणि फॉर्ममध्ये देखील नाही. त्यामुळे त्याची टीम इंडियातील जागा धोक्या आहे. याशिवाय सूर्यकुमार यादव आणि भुवनेश्वर कुमारवरही टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे आता 10 ऑक्टोबरपर्यंत संघात कोणते बदल होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


अजून बातम्या वाचा..

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
.