loader image
[ays_poll id=7]

T20 World Cup – 4 खेळाडूंवर टांगती तलवार!

Oct 6, 2021


टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा 8 सप्टेंबरलाच झाली होती. IPL 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातील काही खेळाडूंच्या खराब फॉर्ममुळे निवडकर्त्यांना संघात बदल करण्यास भाग पाडले आहे. ICCच्या नियमांनुसार सर्व देश 10 ऑक्टोबरपर्यंत संघात बदल करू शकतात. म्हणजेच बीसीसीआयकडे आता थोडाच वेळ शिल्लक आहे. टी 20 वर्ल्ड कप 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

टी 20 वर्ल्ड कप जवळ येत असल्याने टीम इंडियाचे टेन्शन वाढलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सामना हातून गमवल्यानंतर आता टी 20 वर्ल्ड कप टीम इंडियासाठी जिंकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कोहली कर्णधार असताना टीम इंडिया एकही ट्रॉफी आतापर्यंत जिंकू शकली नाही. तर कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा शेवटचा टी 20 वर्ल्ड कप असणार आहे.

विराट कोहलीने टी 20 फॉरमॅटमधून कर्णधारपदावरून पायउतार होणार असल्याची घोषणा केली होती. त्याने ट्वीट करून ही माहिती दिली होती. टी 20 वर्ल्ड कप 2021 UAE मध्ये 17 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताला आपला पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. 

ICCच्या नियमांनुसार, भारताला अजूनही 10 ऑक्टोबरपर्यंत टी -20 वर्ल्ड कप संघात बदल करण्याची संधी आहे. वरुण चक्रवर्तीला दुखापतीमुळे टी -20 वर्ल्ड कपच्या संघातून त्याला वगळलं जाण्याची शक्यता आहे. तर त्याच्या जागी लेगस्पिनर युजवेंद्र चहलला टी -20 वर्ल्ड कप संघात संधी दिली जाण्याची शक्यता आहे. 

हार्दिक पांड्या फिटही नाही आणि फॉर्ममध्ये देखील नाही. त्यामुळे त्याची टीम इंडियातील जागा धोक्या आहे. याशिवाय सूर्यकुमार यादव आणि भुवनेश्वर कुमारवरही टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे आता 10 ऑक्टोबरपर्यंत संघात कोणते बदल होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


अजून बातम्या वाचा..

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड व मनमाड बॉईज (क्लासिक बॉईज) यांच्या संयुक्त...

read more
बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने कॅनडाच्या मिशेल लीविरुद्ध विजय मिळवत सुवर्णपदकाला गवसणी घातली

बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने कॅनडाच्या मिशेल लीविरुद्ध विजय मिळवत सुवर्णपदकाला गवसणी घातली

कॉमनवेल्थ बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने कॅनडाच्या...

read more
खेलो इंडिया रँकिंग वेटलिफ्टींग स्पर्धेत दिया किशोर व्यवहारे ने पटकावले कांस्य पदक

खेलो इंडिया रँकिंग वेटलिफ्टींग स्पर्धेत दिया किशोर व्यवहारे ने पटकावले कांस्य पदक

नागरोटा हिमाचल प्रदेश येथे सुरू असलेल्या पहिल्या राष्ट्रीय खेलो इंडिया महिला रँकिंग वेटलिफ्टिंग...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद आहेर ची राष्ट्रीय खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद आहेर ची राष्ट्रीय खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी

जय भवानी व्यायामशाळेचा आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर याने पंचकुला हरियाणा येथे सुरू...

read more
भुसावळ डिविजन इंटरडिपार्टमेंटल क्रिकेट स्पर्धा : मनमाड पँथर ने पटकावले प्रथम बक्षीस

भुसावळ डिविजन इंटरडिपार्टमेंटल क्रिकेट स्पर्धा : मनमाड पँथर ने पटकावले प्रथम बक्षीस

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...

read more
राष्ट्रीय युथ वेटलिफ्टींग स्पर्धा :आकांक्षा व्यवहारे ठरली नाशिक जिल्ह्यातील पहिली सर्वोत्कृष्ट खेळाडू

राष्ट्रीय युथ वेटलिफ्टींग स्पर्धा :आकांक्षा व्यवहारे ठरली नाशिक जिल्ह्यातील पहिली सर्वोत्कृष्ट खेळाडू

भुवनेश्वर ओडिसा येथे 19 ते 31 मार्च दरम्यान संपन्न झालेल्या राष्ट्रीय युथ,ज्युनिअर,सिनियर...

read more
यंदाच्या IPL सामन्यांवर दहशतवादी हल्ल्याचं सावट? मुंबई पोलिसांनी दिले स्पष्टीकरण

यंदाच्या IPL सामन्यांवर दहशतवादी हल्ल्याचं सावट? मुंबई पोलिसांनी दिले स्पष्टीकरण

आयपीएल स्पर्धेचा पंधरावा सिझन 26 मार्चपासून मुंबईतून सुरू होणार आहेत. मात्र यंदाच्या आयपीएल मॅचवर...

read more
मनमाडच्या भूमी क्रिकेट अकॅडमी चा ऋषी शर्मा या खेळाडूची नाशिकच्या अंडर 14 संघात निवड

मनमाडच्या भूमी क्रिकेट अकॅडमी चा ऋषी शर्मा या खेळाडूची नाशिकच्या अंडर 14 संघात निवड

नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन याच्यातर्फे 14 वर्षा आतील खेळाडुंची जिल्हा संघासाठी डिसेंबर महिन्यात...

read more
.