कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाबाबत आज पालक मंत्री छगन भुजबळ यांनी आढावा बैठक घेतली आहे .नासिक ला लागुनच असलेल्या नगर जिल्ह्यातील जवळपास ६९ गावांमध्ये लॉकडाऊन लागू झाला आहे .या संदर्भात नासिक आढावा बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली .नासिक जिल्ह्यातील गावांमध्ये सतर्कता बाळगणे अत्यंत आवश्यक असल्याचे बैठकीत ठरवण्यात आले .या आधारानुसारच गरज पडल्यास सिन्नर,येवला आणि निफाड या तालुक्यांत निर्बंध कडक करण्यात येतील असा इशाराही बैठकीत देण्यात आला तसेच बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली .
मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या 112 व्या वर्धापन दिना निमित्त “संगणक कक्षाचा शुभारंभ –
आमदार सुहास कांदेंच्या माध्यमातून वाचनालयाच्या सांस्कृतिक वास्तूचे नूतनीकरण होणार ➖फरहानखान मनमाड...











