कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाबाबत आज पालक मंत्री छगन भुजबळ यांनी आढावा बैठक घेतली आहे .नासिक ला लागुनच असलेल्या नगर जिल्ह्यातील जवळपास ६९ गावांमध्ये लॉकडाऊन लागू झाला आहे .या संदर्भात नासिक आढावा बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली .नासिक जिल्ह्यातील गावांमध्ये सतर्कता बाळगणे अत्यंत आवश्यक असल्याचे बैठकीत ठरवण्यात आले .या आधारानुसारच गरज पडल्यास सिन्नर,येवला आणि निफाड या तालुक्यांत निर्बंध कडक करण्यात येतील असा इशाराही बैठकीत देण्यात आला तसेच बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली .
नांदगाव तालुक्यातील बाणगांव बुद्रुक येथील गाव तळ्यात तीन जणांचा मृत्यू झाला
नांदगाव तालुक्यातील बांणगाव येथे आई मुलगा व मामा मेंढी धुण्यासाठी गेले असता तळ्यात पडून मृत्युमुखी...











