loader image
[ays_poll id=7]

*बॅंकेतून अथवा ऑनलाइन व्यवहाराद्वारे पैसे गेल्यास घाबरू नका; फक्त ‘ १५५२६०’ हा नंबर डायल करा

Oct 10, 2021


बॅंकेतून अथवा ऑनलाइन व्यवहाराद्वारे पैसे गेल्यास घाबरू नका; फक्त ‘ १५५२६०’ हा नंबर करा डायल काही मिनिटांत आपली रक्कम होल्डवर जाईल.सायबर गुन्हेगाराने फसवल्याचे कळताच त्वरित १५५२६० या क्रमांकावर कॉल केल्यास सायबर यंत्रणा कामाला लागते आणि अवघ्या सात ते आठ मिनिटांत ट्रान्सफर झालेली रक्कम होल्ड केली जाते. कारण, गुन्हेगार पैसे चोरी करण्यासाठी अनेक खात्यांचा वापर करीत असतात. कॉल येताच संबंधित बॅंक अथवा ई-साइटला अलर्ट केले जाते. त्यामुळे ट्रान्सफर सुरू असतानाच पैसे होल्ड केले जातात.

हि यंत्रणा कशी काम करते?

हेल्पलाइन क्रमांकावर कॉल येताच नाव, मोबाईल, खाते क्रमांक, पैसे वजा झाल्याची वेळ ही महत्त्वाची माहिती विचारली जाते. त्यानंतर सर्व माहिती http://cybercrime.gov.in/ या गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळावरील डॅशबोर्डवर शेअर केली जाते. याकामी आरबीआयचेही सहकार्य मिळत आहे. क्राईम झाल्यानंतर पहिले दोन ते तीन तास अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. आतापर्यंत अनेक नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळाले आहेत.
एकप्रकारचे सुरक्षा कवच

http://cybercrime.gov.in/ हे संकेतस्थळ आणि १५५२६० हा हेल्पलाइन क्रमांक म्हणजे एकप्रकारे सुरक्षा कवच आहे. याला ‘इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन प्लॅटफार्म’ असेही म्हणतात. याच्याशी जवळपास ५५ बॅंका, ई-वॉलेटस् ,पेमेंट गेटवेज, ई-कॉमर्स संकेतस्थळ आणि अन्य वित्तीय सेवा देणाऱ्या संस्था जुळलेल्या आहेत.


अजून बातम्या वाचा..

नाशिक रेल्वे स्थानकावर वन स्टेशन वन प्रोडक्ट स्टॉल चे उद्घाटन ; पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेचा अभूतपूर्व विकास:- डॉ भारती पवार

नाशिक रेल्वे स्थानकावर वन स्टेशन वन प्रोडक्ट स्टॉल चे उद्घाटन ; पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेचा अभूतपूर्व विकास:- डॉ भारती पवार

भारतीय रेल्वेच्या 85 हजार करोड रुपयांच्या देशभरातील विविध विकास कामांच्या उद्घाटन आणि लोकार्पण...

read more
भाजपची भारती पवार यांना पुन्हा पसंती – दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी

भाजपची भारती पवार यांना पुन्हा पसंती – दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी

दिल्ली ता. 13 आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची...

read more
नांदगाव शहरातील गंगाधरी ते रेल्वेफाटक पर्यंतची अतिक्रमणे काढण्याचे सा.बा.वीभागा चे फर्मान

नांदगाव शहरातील गंगाधरी ते रेल्वेफाटक पर्यंतची अतिक्रमणे काढण्याचे सा.बा.वीभागा चे फर्मान

नांदगाव : मारुती जगधने         २४ तासात बेकायदेशीर अतिक्रमणे काढा अन्यथा यंञाच्या सहाय्याने काढली...

read more
.