loader image
[ays_poll id=7]

रामदास कदम यांचे उद्धव ठाकरेंना 6 पानांचे पत्र !

Oct 15, 2021


काही दिवसांपूर्वी शिवसेना मंत्री अनिल परब यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरलं झाली होती, त्यासंदर्भात शिवसेना नेते रामदास कदम यांनी त्यांची बाजू एका पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे मंडळी आहे. 6 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांना रामदास कदम यांनी पत्र पाठवलं आहे.

त्यानंतर रामदास कदम यांना दसरा मेळाव्याला एन्ट्री नसल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. शिवसेनेची परंपरा असलेला दसरा मेळावा ष्णमुखानंद सभागृहात पार पडत आहे. रामदास कदम या मेळाव्याला हजर राहणार का याबाबत चर्चा सुरु आहेत. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळं रामदास कदम यांनी दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार नसल्याचं कळवलं आहे. इन्फेक्शन टाळण्यासाठी उपस्थितीविषयी निर्णय घेतला आहे. रामदास कदम यांनी ऑडिओ क्लिप प्रकरणी त्यांच्या वेदना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कळवल्या आहेत.

शिवसेना नेते रामदास कदम दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार नाहीत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे दसरा मेळाव्याला उपस्थित न राहण्याचा निर्णय कदम यांनी निर्णय घेतला आहे. गेले तीन महिने रामदास कदम हे आजारी आहेत. रामदास कदम यांच्यावर ब्रीज कँडी रुग्णालयात आणि घरीचं दोन महिने उपचार सुरु होते. इन्फेक्शनची लागण होऊ नये यासाठी डॉक्टरांनी त्यांना गर्दीत न जाण्याचा सल्ला दिला आहे त्यामुळे दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार नसल्याचं कदम यांनी पत्राद्वारे कळवलं आहे.


अजून बातम्या वाचा..

नगर परिषद इमारतीसाठी दहा कोटींचा निधी मंजूर – आमदार कांदे यांच्या पाठपुराव्याला यश

नगर परिषद इमारतीसाठी दहा कोटींचा निधी मंजूर – आमदार कांदे यांच्या पाठपुराव्याला यश

मनमाड : राज्य शासनातर्फे नगर परिषदांना वैशिष्टपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेंतर्गत मनमाड नगर...

read more
भूमी अभिलेख विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना तीन लाखांची लाच घेतांना एसीबी ने केली अटक

दोन लाखाची लाच स्वीकारताना वीज वितरण कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना एसीबी ने केली अटक

धुळे विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अंतर्गत केलेल्या वीज जोडणीचे बिल विना त्रुटी...

read more
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

read more
.