loader image
[ays_poll id=7]

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध आणखी शिथिल होण्याची शक्यता !

Oct 18, 2021


राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी होत आहे, त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शाळा, मंदिरे सुरु केली आहेत. आता राज्यातील निर्बंध अजून कमी होण्याचे संकेत दिले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्कफोर्ससोबत आज एक मोठी बैठक होणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कालच राज्यात कोरोना निर्बंध शिथिल करण्याचे संकेत दिले होते. पुढील काही दिवसात राज्यातील मॉल, दुकानं, हॉटेल्स याबाबत काही अटी नियम शिथिल होतील असे सरकारकडून संकेत मिळतायत, त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज बोलाविलेली टास्कफोर्स सोबतची बैठकी महत्वाची मानली जात आहे.

सध्यस्थितीत व्यापारी दुकानं, बार, रेस्टॉरंट, मॉल्स यांना रात्री 10 वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याची परवानगी आहे. हॉटेल्समध्येही 50 टक्के ग्राहकांनाच मुभा आहे. दसरा आता पार पडलाय आणि दिवाळी तोंडावर आहे. त्यामुळे सण उत्सवात लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. त्यातच मुंबईत काल एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. या पार्श्वभूमीवर दुकानं, बार, रेस्टॉरंट, मॉल्सच्या वेळेची मर्यादा वाढवली जाण्याची शक्यता आहे. त्याबाबतचा निर्णयही एक दोन दिवसातच सरकारी जारी करेल अशीही सूत्रांची माहिती आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
.