loader image
[ays_poll id=7]

भारत-पाक सामना होणारच – BCCI !

Oct 20, 2021


संपूर्ण देशभरातून विरोध होत असलेल्या  टी-20 विश्वचषकातील भारत-पाक सामना नियोजित तारखेलाच होणार असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.

टी-20 विश्वचषक ग्रुप स्टेजमधील सामन्यांचा थरार युएईत सुरु झाला आहे तर भारत असलेल्या सुपर 12 गटाचे सामने 23 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. भारताची पहिलीच लढत पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान सोबत होत आहे. परंतु या सामन्यावर बंदीचं सावट होतं. गेल्या काही दिवसांत काश्मीरमध्ये वाढलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव खूपच  वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी -20 विश्वचषक सामना रद्द करण्याची मागणी अनेक राजकीय नेत्यांसह विविध संघटनांनी केली होती. मात्र कोणत्याही परिस्थितीत भारत पाकिस्तान सामना होणार असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.

टी -20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 5 सामने झाले आहेत, त्यापैकी टीम इंडियाने सर्व पाच सामने जिंकले आहेत.


अजून बातम्या वाचा..

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
.