loader image
[ays_poll id=7]

भारत-पाक सामना होणारच – BCCI !

Oct 20, 2021


संपूर्ण देशभरातून विरोध होत असलेल्या  टी-20 विश्वचषकातील भारत-पाक सामना नियोजित तारखेलाच होणार असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.

टी-20 विश्वचषक ग्रुप स्टेजमधील सामन्यांचा थरार युएईत सुरु झाला आहे तर भारत असलेल्या सुपर 12 गटाचे सामने 23 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. भारताची पहिलीच लढत पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान सोबत होत आहे. परंतु या सामन्यावर बंदीचं सावट होतं. गेल्या काही दिवसांत काश्मीरमध्ये वाढलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव खूपच  वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी -20 विश्वचषक सामना रद्द करण्याची मागणी अनेक राजकीय नेत्यांसह विविध संघटनांनी केली होती. मात्र कोणत्याही परिस्थितीत भारत पाकिस्तान सामना होणार असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.

टी -20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 5 सामने झाले आहेत, त्यापैकी टीम इंडियाने सर्व पाच सामने जिंकले आहेत.


अजून बातम्या वाचा..

जय भवानी व्यायामशाळेच्या वीणाताई आहेर व आकांक्षा व्यवहारे ला राष्ट्रीय खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक

जय भवानी व्यायामशाळेच्या वीणाताई आहेर व आकांक्षा व्यवहारे ला राष्ट्रीय खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक

इंदोर मध्यप्रदेश येथे सुरु असलेल्या पाचव्या राष्ट्रीय खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेची सुरवात 40...

read more
आर.ए.चषक 2023 मनमाड क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना विजेता एस.ए.चॅलेंजर संघ व उपविजेता स्पीड क्रिकेट संघ

आर.ए.चषक 2023 मनमाड क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना विजेता एस.ए.चॅलेंजर संघ व उपविजेता स्पीड क्रिकेट संघ

मनमाड :- सनी क्रिकेट क्लब,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रीडांगण मनमाड येथे...

read more
कोपरगाव येथील अंडर 14 क्रिकेट स्पर्धेत भूमी क्रिकेट अकॅडमीच्या संघाचा फायनल मध्ये प्रवेश – अद्वैत पारिख ठरला सामनावीर

कोपरगाव येथील अंडर 14 क्रिकेट स्पर्धेत भूमी क्रिकेट अकॅडमीच्या संघाचा फायनल मध्ये प्रवेश – अद्वैत पारिख ठरला सामनावीर

बुधवार दि. 23 जानेवारी रोजी साई सिटी कोपरगाव येथे साईकृपा क्रिकेट अकॅडमी आयोजीत साईकृपा अंडर 14...

read more
.