loader image
[ays_poll id=7]

भारत-पाक सामना होणारच – BCCI !

Oct 20, 2021


संपूर्ण देशभरातून विरोध होत असलेल्या  टी-20 विश्वचषकातील भारत-पाक सामना नियोजित तारखेलाच होणार असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.

टी-20 विश्वचषक ग्रुप स्टेजमधील सामन्यांचा थरार युएईत सुरु झाला आहे तर भारत असलेल्या सुपर 12 गटाचे सामने 23 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. भारताची पहिलीच लढत पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान सोबत होत आहे. परंतु या सामन्यावर बंदीचं सावट होतं. गेल्या काही दिवसांत काश्मीरमध्ये वाढलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव खूपच  वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी -20 विश्वचषक सामना रद्द करण्याची मागणी अनेक राजकीय नेत्यांसह विविध संघटनांनी केली होती. मात्र कोणत्याही परिस्थितीत भारत पाकिस्तान सामना होणार असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.

टी -20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 5 सामने झाले आहेत, त्यापैकी टीम इंडियाने सर्व पाच सामने जिंकले आहेत.


अजून बातम्या वाचा..

खेळामुळे युवकांचे जीवन घडू शकते- डॉ. हरिष आडके, मनमाड महाविद्यालयात नाशिक विभागीय आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

खेळामुळे युवकांचे जीवन घडू शकते- डॉ. हरिष आडके, मनमाड महाविद्यालयात नाशिक विभागीय आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालययात आंतर महाविद्यालयीन...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारे ला राष्ट्रीय खेलो इंडिया महिला रँकिंग स्पर्धेत नवीन राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक

आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारे ला राष्ट्रीय खेलो इंडिया महिला रँकिंग स्पर्धेत नवीन राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक

मोदीनगर येथे सुरू असलेल्या दुसऱ्या राष्ट्रीय खेलो इंडिया महिला रँकिंग स्पर्धेत आंतरराष्ट्रीय...

read more
मनमाड च्या भूमी क्रिकेट अकॅडमीच्या मयूर शिंदेची नाशिक जिल्हा अंडर – 14 संभावित संघात निवड

मनमाड च्या भूमी क्रिकेट अकॅडमीच्या मयूर शिंदेची नाशिक जिल्हा अंडर – 14 संभावित संघात निवड

नाशिक जिल्हा अंडर-14 संघाच्या संभावित खेळाडुंच्या यादित मनमाड येथील भुमी क्रिकेट अकॅडमी च्या मयुर...

read more
.