आजपासून भारताची संघाची टी-२० मोहिमेला सुरुवात होत आहे. भारताचा पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होत आहे. भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. पाकिस्तानसोबत दोन हात करण्यासाठी भारतीय संघ पूर्णपणे तयार असल्याचे विराट कोहली म्हणाला.
आजपर्यंतचा अनुभव पाहता भारतीय संघ विश्वचषक सामन्यात पाकिस्तानपेक्षा दरवेळी सरस राहिलेला आहे. आजच्या सामन्याचा काय परिणाम येतो, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागून आहे.












