loader image
[ays_poll id=7]

मिशन १०० : मुंबई महानगरपालिका निवडणुकीची सूत्रे आदित्य ठाकरेंकडे !

Nov 1, 2021


शिवसेनेसाठी कायम प्रतिष्ठेची असलेली मुंबई महानगर पालिका पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजण्यास आता सुरुवात झाली आहे. महानगरपालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी शिवसेनेने बैठकांचा धडाका लावला आहे. फेब्रुवारीत होणाऱ्या निवडणुकीवर शिवसेनेने सर्व लक्ष केंद्रित केले असून युवा सेनाप्रमुख व राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हातात निवडणुकीची सर्व सूत्रे असणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या वेळी पालिकेत पक्षाचे संख्याबळ वाढवायचे असून बंडखोरी टाळण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत तसेच इच्छुकांची चाचपणी करण्यात येत आहे.

सत्ता स्थापनेसाठी ११४ नगरसेवकांचे बहुमतांची गरज असलेल्या महानगरपालिकेत शिवसेनेचे ९४ नगरसेवक आहेत. यावेळी सेनेने मिशन १०० चा नारा दिला आहे. सेना महाविकास आघाडीत असली तरी पालिकेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढणार आहे. पक्षांतर्गत सूत्रे परिवहन मंत्री व सेना नेते अनिल परब यांच्या हाती असणार आहेत.

मुंबईत पूर्वीप्रमाणेच एकसदस्यीय प्रभाग रचना कायम राहणार असून सदस्य संख्या पूर्वीप्रमाणे २२७ इतकीच आहे. त्यात अनुसूचित जातीसाठी १५, जमातीसाठी २ तर ओबीसीला ६१ जागा राखीव आहेत. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मुंबईत नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक फेब्रुवारीत होणार हे निश्चित आहे. 


अजून बातम्या वाचा..

पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध मनमाड मराठी पत्रकार संघाने केला निषेध

पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध मनमाड मराठी पत्रकार संघाने केला निषेध

पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना सत्ताधारी गटाच्या लोकप्रतिनीधीच्या कार्यकर्त्यांकडून बेदम...

read more
शिक्षणाला जोड मेहनतीची – मनमाड च्या सुशील पवारने अमेरिकेत शिष्यवृत्तीच्या जोरावर शिक्षण घेत मिळविला बेस्ट  आऊट स्टँडींग अवॉर्ड

शिक्षणाला जोड मेहनतीची – मनमाड च्या सुशील पवारने अमेरिकेत शिष्यवृत्तीच्या जोरावर शिक्षण घेत मिळविला बेस्ट आऊट स्टँडींग अवॉर्ड

अनेकांनी स्वप्न पाहिलेले असते की परदेशात जाऊन शिक्षण घ्यावं मात्र हे स्वप्न सत्यात उतरवणे...

read more
बघा व्हिडिओ – रायपूर गावातील शिव रस्ता केला ग्रामस्थांनी बंद – अतिक्रमण हटवून मोजणी करण्याची गावकऱ्यांची मागणी

बघा व्हिडिओ – रायपूर गावातील शिव रस्ता केला ग्रामस्थांनी बंद – अतिक्रमण हटवून मोजणी करण्याची गावकऱ्यांची मागणी

चांदवड तालुक्यातील रायपूर येथील शीव रस्ता शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने बालवाडी तसेच चिमुकल्यांना...

read more
‘अमृत भारत स्थानक योजना’ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील रेल्वेस्थानके चमकणार : डॉ. भारती पवार देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते V .C. द्वारे होणार उद्घाटन

‘अमृत भारत स्थानक योजना’ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील रेल्वेस्थानके चमकणार : डॉ. भारती पवार देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते V .C. द्वारे होणार उद्घाटन

केंद्र सरकारमार्फत रेल्वे मंत्रालयाच्या वतीने अमृत भारत (Amrut Bharat) स्टेशन योजनेतून भुसावळ...

read more
भूमी अभिलेख खात्यातील अजून एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

भूमी अभिलेख खात्यातील अजून एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

नाशिक जिल्ह्यातील प्रशासनातील लाचखोर अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात टिपले जात असून...

read more
.