कोरोना काळात शासनाच्या वतीने देशातील नागरिकांना रेशन दुकानाद्वारे धान्य पुरवठा करण्यात आला आणि नागरिकांना लॉकडाऊन मध्ये त्याचा खूप मोठा लाभ झाला. राज्यातील रेशन दुकानातून आता दैनदिन वापरत येणाऱ्या वस्तूंची देखील विक्री केली जाणार आहे. खुल्या बाजारातील आंघोळ व धुण्याचा साबण, हँडवॉश, डिटर्जंट पावडर, शाम्पू, चहा-कॉफी विकता येईल. त्यास अन्न-नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने बुधवारी मान्यता दिली. ही परवानगी अस्थायी स्वरुपाची असून, सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या स्वरुपात होणाऱ्या बदलात त्याचा समावेश होण्याची शक्यता विभागाने स्पष्ट केली आहे.
काश्मीर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा नांदगाव शिवसेनेतर्फे जाहीर निषेध
नांदगाव :मारुती जगधने भारताचा मुकूट असलेल्या जम्मू काश्मिर येथील पहलगाम येथे अतिरेक्यांनी...









