कोरोना काळात शासनाच्या वतीने देशातील नागरिकांना रेशन दुकानाद्वारे धान्य पुरवठा करण्यात आला आणि नागरिकांना लॉकडाऊन मध्ये त्याचा खूप मोठा लाभ झाला. राज्यातील रेशन दुकानातून आता दैनदिन वापरत येणाऱ्या वस्तूंची देखील विक्री केली जाणार आहे. खुल्या बाजारातील आंघोळ व धुण्याचा साबण, हँडवॉश, डिटर्जंट पावडर, शाम्पू, चहा-कॉफी विकता येईल. त्यास अन्न-नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने बुधवारी मान्यता दिली. ही परवानगी अस्थायी स्वरुपाची असून, सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या स्वरुपात होणाऱ्या बदलात त्याचा समावेश होण्याची शक्यता विभागाने स्पष्ट केली आहे.
मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे – प्राचार्य डॉ. अरुण पाटील
मनमाड (नाशिक) – महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात...







