loader image
[ays_poll id=7]

५८० वर्षानंतर १९ नोव्हेंबर रोजी सर्वाधिक काळ चालणारे अंशिक चंद्रग्रहण !

Nov 18, 2021


खगोल शास्त्रात चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण यांचे विशेष महत्व आहे. ग्रहणाचे ज्योतिष शास्त्रात देखील मोठे महत्व आहे. १९ नोव्हेंबर रोजी या वर्षीचे अखेरचे चंद्रग्रहण होणार आहे. हे या वर्षीचे तिसरे ग्रहण असून दुसरे चंद्रग्रहण आहे आणि हे चंद्रग्रहण विशेष महत्वाचे आहे. याच वर्षी ४ डिसेंबर रोजी एक सूर्यग्रहण देखील आहे.

१९ नोव्हेंबर रोजी होणारे चंद्रग्रहण अतिशय वैशिष्टपूर्ण आहे कारण असे चंद्रग्रहण ५८० वर्षानंतर होणार आहे. अशा प्रकारचे चंद्रग्रहण आजपासून सुमारे ५८० वर्षपूर्वी लागले होते. या आधी अशाप्रकारचे चंद्रग्रहण सन १४४० साली लागले होते, आता १९ नोव्हेंबर २०२१ रोजी आणि भविष्यात ८ फेब्रुवारी २६६९ रोजी दिसेल. म्हणजे आजपासून ६४८ वर्षानंतर अशा प्रकारचे दीर्घ काळ चालणारे चंद्रग्रहण दिसणार आह. हे सर्वात अधिक वेळ चालणारे अंशिक चंद्रग्रहण असून याचा कालावधी ३ तास इतका असेल. १९ नोव्हेंबर रोजी पृथ्वीपासून चंद्राचे अंतर अधिक जास्त असल्याने हे चंद्रग्रहण जास्त वेळ सुरु राहील, असे खगोल शास्त्रज्ञाचे मत आहे.

पुढील वर्षी ८ नोव्हेंबर २०२२ रोजी पुढील चंद्रग्रहण होईल म्हणजे खगोल शास्त्रज्ञाना पुढील चंद्रग्रहण पाहण्यासाठी एक वर्ष वाट पहावी लागेल.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमा अंतर्गत, ‘वाचन कौशल्य कार्यशाळेचे’ आयोजन

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमा अंतर्गत, ‘वाचन कौशल्य कार्यशाळेचे’ आयोजन

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात, उच्च व...

read more
मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे, उच्च...

read more
भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

२०२४ कार्यशाळेचे आयोजन येवला शहरात दहा हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विजया...

read more
.