loader image
[ays_poll id=7]

शेती पंपांची सक्तीची वसुली थांबवावी : सरपंच सेवा महासंघाची मागणी !

Nov 29, 2021


यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी सर्व बाजूनी होरपळून निघाला आहे, त्यातच महावितरण कडून सक्तीची वसुली सुरु असल्यामुळे शेतकरी अजूनच हलाकीच्या परीस्तीतीतून जात आहे, तरी महावितरण कडून होणारी सक्तीची वसुली त्वरित थांबविण्यात येवून शेतकर्यांना शासनाने दिलासा द्यावा, या मागणीचे निवेदन सरपंच शेतकरी महासंघातर्फे देविदास उगले यांनी राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांना दिले आहे.

शेतकरी बांधवाना शेती पंपासाठी ३ फेज लाईटची गरज असते, महावितरण शेती पंपासाठी रात्री उशिरा लाईट उपलब्ध करून देते आणि ती सुद्धा ये-जा करत असते. दिवसा सिंगल फेज सुद्धा लाईट नियमित उपलब्ध नसते, या आणि यासारख्या अनेक समस्यांना शेतकरी दररोज सामोरे जात आहे, तरी शासनाने शेतकरी हितासाठी योग्य निर्णय घ्यावा, असे देखील निवेदनात म्हटले आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड दिवाणी व फौजदारी न्यायालयात बाल कामगार विरोधी दिन व पर्यावरण दिनानिमित्त शिबीर संपन्न

मनमाड दिवाणी व फौजदारी न्यायालयात बाल कामगार विरोधी दिन व पर्यावरण दिनानिमित्त शिबीर संपन्न

  मनमाड - तालुका विधी सेवा समिती व मनमाड वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मनमाड येथील...

read more
शालेय राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी साक्षी वानखेडेची महाराष्ट्र संघात निवड

शालेय राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी साक्षी वानखेडेची महाराष्ट्र संघात निवड

सिंधुदुर्ग येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय १९ वर्ष वयोगटात ५९ किलो मध्ये सुवर्णपदक प्राप्त करणारी...

read more
रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांची कामगिरी ; ५९ मुलांची तस्करी करणाऱ्या पाच जणांना मनमाड रेल्वे स्थानकात अटक – न्यायालयाने सुनावली १२ दिवसांची कोठडी

रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांची कामगिरी ; ५९ मुलांची तस्करी करणाऱ्या पाच जणांना मनमाड रेल्वे स्थानकात अटक – न्यायालयाने सुनावली १२ दिवसांची कोठडी

मनमाड : रेल्वेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आज रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस यांनी...

read more
.