loader image
[ays_poll id=7]

शेती पंपांची सक्तीची वसुली थांबवावी : सरपंच सेवा महासंघाची मागणी !

Nov 29, 2021


यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी सर्व बाजूनी होरपळून निघाला आहे, त्यातच महावितरण कडून सक्तीची वसुली सुरु असल्यामुळे शेतकरी अजूनच हलाकीच्या परीस्तीतीतून जात आहे, तरी महावितरण कडून होणारी सक्तीची वसुली त्वरित थांबविण्यात येवून शेतकर्यांना शासनाने दिलासा द्यावा, या मागणीचे निवेदन सरपंच शेतकरी महासंघातर्फे देविदास उगले यांनी राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांना दिले आहे.

शेतकरी बांधवाना शेती पंपासाठी ३ फेज लाईटची गरज असते, महावितरण शेती पंपासाठी रात्री उशिरा लाईट उपलब्ध करून देते आणि ती सुद्धा ये-जा करत असते. दिवसा सिंगल फेज सुद्धा लाईट नियमित उपलब्ध नसते, या आणि यासारख्या अनेक समस्यांना शेतकरी दररोज सामोरे जात आहे, तरी शासनाने शेतकरी हितासाठी योग्य निर्णय घ्यावा, असे देखील निवेदनात म्हटले आहे.


अजून बातम्या वाचा..

विश्व रत्न महामानव परम पूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त रेल्वे स्टेशन रिक्षा युनियनच्या वतीने लाडु वाटप

विश्व रत्न महामानव परम पूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त रेल्वे स्टेशन रिक्षा युनियनच्या वतीने लाडु वाटप

विश्व रत्न महामानव परम पूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त लाडू वाटप चा...

read more
ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशन च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशन च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडळ व संयुक्त जयंती उत्सव समिती,...

read more
.