loader image
[ays_poll id=7]

ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात वाढ : विद्युत व्यवस्थापकांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे मानले आभार!

Nov 29, 2021


थंडी, उन, वारा, पाऊस या अस्मानी संकटात मानधनावर काम करणाऱ्या राज्यातील ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात वाढ करण्याचे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महावितरणला दिले आहे.
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांनी ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या कामाचे स्वरूप पाहून म.रा.वी.मं. सुत्रधारी कंपनीच्या कार्यालयामध्ये नुकतीच बैठक घेतली. या बैठकीस महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे व संचालक (प्रकल्प/मासं) भालचंद्र खंडाईत उपस्थित होते. तीन हजार लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये महावितरणकडून काही सेवा पुरविण्यासाठी फ्रेन्चायझी तत्त्वावर ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना प्रतिमाह ३ हजार रुपये मानधन देण्यात येत होते. कामाच्या तुलनेत मानधन कमी असल्यामुळे ग्राम विद्युत व्यवस्थापकांनी ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांच्याकडे मानधनात वाढ करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात २ हजार रुपयाची वाढ करण्यात आली असून याचा लाभ राज्यातील ५०० हून अधिक ग्राम विद्युत व्यवस्थापकांना मिळणार आहे. शुक्रवार (दि.२६) पासून ही वाढ लागू झाली आहे.
ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांनी ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात केलेल्या वाढीबाबत ग्राम विद्युत व्यवस्थापक अण्णासाहेब चौभे, महेश तुपे व इतर ग्रामविद्युत व्यवस्थापकांनी ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांचे आभार व्यक्त केले आहे.


अजून बातम्या वाचा..

शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री सचिन पटेल व ज्येष्ठ नागरिक संघर्ष समितीत चर्चा

शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री सचिन पटेल व ज्येष्ठ नागरिक संघर्ष समितीत चर्चा

मनमाड शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात येथील ज्येष्ठ नागरिक संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिनांक ९...

read more
बघा व्हिडिओ – मनमाडच्या कांत परिवाराने ‘तैवान देशात’ साजरी केली श्री गुरुनानकजी जयंती

बघा व्हिडिओ – मनमाडच्या कांत परिवाराने ‘तैवान देशात’ साजरी केली श्री गुरुनानकजी जयंती

मनमाड : ( योगेश म्हस्के )येथील प्रसिद्ध व्यापारी आणि निराला स्टोअर्सचे संचालक श्री गुरूदीपसिंग...

read more
ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला – १८ डिसेंबर रोजी मतदान, २० डिसेंबरला निकाल

ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला – १८ डिसेंबर रोजी मतदान, २० डिसेंबरला निकाल

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील ग्राम पंचायत निवडणुकांची तारीख जाहीर केली असून...

read more
.