loader image
[ays_poll id=7]

ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात वाढ : विद्युत व्यवस्थापकांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे मानले आभार!

Nov 29, 2021


थंडी, उन, वारा, पाऊस या अस्मानी संकटात मानधनावर काम करणाऱ्या राज्यातील ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात वाढ करण्याचे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महावितरणला दिले आहे.
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांनी ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या कामाचे स्वरूप पाहून म.रा.वी.मं. सुत्रधारी कंपनीच्या कार्यालयामध्ये नुकतीच बैठक घेतली. या बैठकीस महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे व संचालक (प्रकल्प/मासं) भालचंद्र खंडाईत उपस्थित होते. तीन हजार लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये महावितरणकडून काही सेवा पुरविण्यासाठी फ्रेन्चायझी तत्त्वावर ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना प्रतिमाह ३ हजार रुपये मानधन देण्यात येत होते. कामाच्या तुलनेत मानधन कमी असल्यामुळे ग्राम विद्युत व्यवस्थापकांनी ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांच्याकडे मानधनात वाढ करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात २ हजार रुपयाची वाढ करण्यात आली असून याचा लाभ राज्यातील ५०० हून अधिक ग्राम विद्युत व्यवस्थापकांना मिळणार आहे. शुक्रवार (दि.२६) पासून ही वाढ लागू झाली आहे.
ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांनी ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात केलेल्या वाढीबाबत ग्राम विद्युत व्यवस्थापक अण्णासाहेब चौभे, महेश तुपे व इतर ग्रामविद्युत व्यवस्थापकांनी ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांचे आभार व्यक्त केले आहे.


अजून बातम्या वाचा..

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त १५ जुलै पासून लसीकरण केंद्रावर बुस्टर डोस मोफत

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त १५ जुलै पासून लसीकरण केंद्रावर बुस्टर डोस मोफत

कोरोना विरोधी लसीकरणातील महत्वाचा टप्पा मानला जाणाऱ्या बुस्टर डोसबाबत केंद्र सरकार ने महत्वाचा...

read more

(बघा व्हिडिओ)हिमस्खलनातून बचावला ट्रेकिंगला गेलेला ग्रुप – कझाकिस्तान मधील घटना

कझागिस्तान मधील तियान शान पर्वत रांगेत ट्रेकिंग साठी गेलेल्या हैरी शिमिन हे त्यांच्या ट्रेकर्स...

read more
शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा;सुनावणी पूर्ण होईपर्यंत कारवाई न करण्याची सूचना

शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा;सुनावणी पूर्ण होईपर्यंत कारवाई न करण्याची सूचना

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. आज सुप्रिम कोर्टामध्ये...

read more
“वेळ पडल्यास नवीन निवडणूक चिन्ह घेऊ.. पण गाफील नका राहू” ; उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

“वेळ पडल्यास नवीन निवडणूक चिन्ह घेऊ.. पण गाफील नका राहू” ; उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

शिवसेनेतील ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर आता...

read more
आमचे बंड नव्हे हा तर उठाव ; मातोश्री वर सन्मानाने बोलवल्यास परत जाऊ – आमदार संजय राठोड

आमचे बंड नव्हे हा तर उठाव ; मातोश्री वर सन्मानाने बोलवल्यास परत जाऊ – आमदार संजय राठोड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही ४० आमदारांनी घेतलेली भूमिका बंड नव्हे तर उठाव...

read more
.