ऐतिहासिक पगारवाढ जाहीर करून देखील गेल्या महिन्यापेक्षा जास्त कालावधी पासून सुरु असलेले एसटी कर्मचार्यांचे आंदोलन काही केल्या संपण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे, कर्मचारी विलीकरनाच्या मागणीवर ठाम आहेत. यात आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचार्यांना शेवटचा अल्टीमेटम दिला आहे. “जे कर्मचारी सोमवार पर्यंत कामावर हजार होतील त्यांचे निलंबन मागे घेण्यात येईल” असे त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.
निलंबित कर्मचार्यांना कामावर येण्यासाठी एक संधी देण्यात यावी यासाठी हा पर्याय शासनाने सोमवार पर्यंत खुला ठेवला असून सोमवार पर्यंत यावर तोडगा न निघाल्यास कठोर कारवाईचे संकेत परब यांनी दिले आहे. जे कामगार सोमवारपर्यंत कामावर येतील, त्यांचं निलंबन मागे घेऊ. जिथे डेपो ५० टक्क्यांपेक्षा जास्त चालू होईल, त्यांना त्याच डेपोमध्ये काम दिलं जाईल. पण जिथे तेवढी कामगार संख्या नाही होणार, त्यांना आजूबाजूच्या डेपोमध्ये सामावून घेतलं जाईल, असेही अनिल परब यांनी स्पष्ट केले.








