कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या प्रवासासाठी आरक्षित तिकीटाची अट ठेवली आहे मात्र २५ डिसेंबर पासुन मनमाड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई पंचवटी एक्सप्रेस या गाडीत प्रवास करण्यासाठी हा नियम शिथिल करण्यात आला आहे. त्यासाठी आता ६ डबे अनारक्षित प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहेत. उदरनिर्वाहासाठी दैनंदिन नाशिक व मुंबई प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना या निर्णयामुळे काहीसा दिलासा मिळणार आहे.
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला
. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...











