राज्यातील पेपरफुटी प्रकरणात औरंगाबाद येथील काही स्पर्धा परीक्षा क्लासेस संचालकांना अटक करण्यात आली. वरिष्ठ सरकारी अधिकार्यांशी असलेल्या संबंधांमुळे, गेल्या अनेक वर्षांपासून अशाप्रकारे तक्रारी व बातम्या येत आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी, शासनाने काल विधानसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, लवकरच या प्रकारच्या क्लासेसवर निर्बंध आणून कडक कायदा आणण्यात येईल. पण काही मुठभर संचालकांच्या चुकीची शिक्षा सर्वसामान्य व प्रामाणिकपणे क्लासेसचालकांना का व्हावी, असा सवाल करत, सरकारला कायदा करताना विश्वासात घेण्याविषयी निवेदन देणे व याविषयी अधिक निर्णय घेण्यासाठी, उद्या रविवारी २६ ला, सकाळी ११ वाजता, शिंगाडा तलाव येथील, नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या कार्यालयात याबाबत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केल्याची माहिती, संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी दिली. शहर व जिल्ह्यातील सर्व स्पर्धा परीक्षा क्लासेस संचालकांनी जबाबदारीने या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे या विभागाचे प्रमुख सागर सानप, लखन अग्रवाल, जितेंद्र गवळी, अमृतकर यांच्यावतीने, संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
1 एप्रिल पासून टोलवर ‘नो कॅश’
टोलनाक्यांवरील मानवी हस्तक्षेप व वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग...











