उजाडरानी किमया केलीस मोठी
भिमा तुझ प्रणाम कोटी कोटी।।
कविवर्य विनायक (विनय) पाठारे
आपल्या आयुष्यभर लोकरंजनातून लोकप्रबोधनाचा वसा घेत प्रामुख्याने मराठी व हिंदी,भोजपुरी,उर्दू भाषेत बुद्ध-आंबेडकरी काव्य-गीत-गझल,पोवाडा,नाट्य संहिता सह अनेक साहित्यिक प्रांत हाताळणारे सिद्धहस्त कवी,गायक,संगीतकार तथा सम्यक विद्रोहाचे भाष्यकार कविवर्य विनायक (दादा) पाठारे आज काळाच्या दूर आपल्यातून निघून गेले.
“अंबर नीला,समंदर नीला।निली ‘तेरी कहाणी है।अंबर से उची, समंदर से गहरी, बाबा ‘तेरी कहाणी है।”
या गीता सोबतच
“बहुजनांनो दक्ष व्हारे,वेध हा तुमचा घेत आहे,मांजराच्या पावलांनी पेशवाई येत आहे”
ह्या अजरामर गझल चे गझलकार
आणि मूळचे कामगार कष्टकरी माय मातेची व्याकुळता सांगणारे *”कारभारी दमान, होऊद्या दमान,होऊद्या दमान अंग भिजल घामान”
ह्या गीताचे गीत-संगीतकार लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक,महाराष्ट्र (स्थापना २००१) चे सन्मानीय सल्लागार विनायक दादा पाठारे (विनय) यांना विनम्र आदरांजली
जन्म : 3 ऑगस्ट 1948 (वडाळा-मुंबई) मृत्यु 26 डिसेंबर 2021(समता नगर टाकळी, नाशिक)/जन्म गांव : म्हाळसाकोरे (निफाड),अल्बम : योगदान भिमाचे,भीमजी के गांव में, जयभीम बोलया लाजू नका इ.,चित्रपट : बंडखोर (संगीत),साथ दे मला (संगीत),अन्यायाचा प्रतिकार (गाणी),फक्त सातवी पास (गाणी)/काव्यसंग्रह : इतिहास घडविला तुम्ही,गझला बहुजनांच्या (आंबेडकरवादी गझल संग्रह) विनय गाथा/आगामी लावणी संग्रह (कारभारी दमानं, वात्सल्य शिंधु) आदी… त्यांचा लोकरंजनातून लोकप्रबोधन परिवर्तनाचा साहित्य सांस्कृतिक वारसा पुढे घेऊन जाऊ या…!
श्रीराम जन्मोत्सव निमित्त मनमाडला बुधवारी बैठकीचे आयोजन
मनमाड- सालाबादप्रमाणे 1986 पासून सलग 40 व्या वर्षी यंदाही श्रीराम मंदिर आठवडे बाजार मनमाड येथे...











