loader image
[ays_poll id=7]

इंदूर – पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी नित्याचीच, वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी – मागणी !

Jan 20, 2022


चांदवड – मनमाड मार्गाच्या  दुपदरीकरणाचे काम सुरू असल्याने इंदौर पुणे  महामार्गावर रोजच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.  वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या जात असून दोन – दोन तास रांग हटत नसल्याने वाहनधारकांना मोठी डोकेदुखी होत आहे.  कांद्याची आवक वाढल्याने दररोज चारशेहून अधिक ट्रॅक्टर याच मार्गावरील बाजार समितीमध्ये येतात. यामुळे नेहमीच वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

चांदवड ते मनमाड मार्गाच्या दुपदरीकरणाचे  काँक्रीटीकरण करण्याचे काम सध्या सुरू आहे. नांदगाव मार्गाचे काम सुरू झाले नसले तरी चांदवड मार्गाचे काम मालेगाव चौफिली पर्यंत आले आहे. सदर काम दुपदरी असले तरी एक पदरी काम होत असून एक बाजूचा मार्ग वाहतूकीसाठी सुरू बठेवण्यात आला असून या कामामुळे चांदवड, नांदगाव आणि पुणे इंदौर राष्ट्रीय महामार्गावर रोजच मोठी वाहतूक कोंडी होत आहे.   इंदौर पुणे महामार्गावरून मोठ्या प्रमाणात जड अवजड वाहतूक होते सतत वर्दळीचा मार्ग असल्याने या वाहतूक कोंडीमुळे  वाहनधारकांना मोठी डोकेदुखीचा सामना करावा लागत आहे. अगोदरच खड्ड्यामुळे इंदौर पुणे महामार्गाची अक्षरशः  चाळण झाली आहे. त्यातच या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक हैराण झाले आहे. येण्याजण्यास अनेकदा नको वाटतो हा रस्ता इतका त्रास सहन करावा लागत आहे. दररोज सकाळी आणि सायंकाळी वाहनांची गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. अनेकदा गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका देखील या वाहतूक कोंडीत अडकल्या जात असल्याने रुग्णाच्या जीवावर देखील बेतत आहे. त्यातच या मार्गावर कृषी उत्पन्न बाजार समिती असल्याने कांदा विक्रीसाठी आलेल्या  शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरची एकच गर्दी होते तर नांदगाव मार्गाने इंधन कंपन्यांचे प्रकल्प असल्याने इंधन टँकरची ये जा असल्याने मोठी गर्दी असते त्यात जड, अवजड वाहनांची वाहतूक आणि मध्येच  घुसणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होते या चार ही मार्गावर लांबच लांब वाहनांच्या  रांगा लागल्या जातात. त्यामुळे प्रवाशांचा या वाहतूक कोंडीत खोळंबा होतो. या महामार्गावर आज पर्यंत अनेकांचे अपघात झाले आहे. रोजच होणाऱ्या या वाहतूक कोंडी मुळे शहरातील नागरिकांसह वाहनधारकांना मोठा मनस्थाप सहन करावा लावतो तर कोंडी झालेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. या वाहतूक कोंडीवर लवकरच मार्ग शोधला जावा आणि मालेगाव चौफुलीवर वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी होत आहे. 


अजून बातम्या वाचा..

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून...

read more
.