loader image
[ays_poll id=7]

गोदावरी एक्सप्रेस मनमाड येथूनच सुरू करावी : रिपाईची मागणी

Jan 26, 2022


राज्यराणी , तपोवननंतर आता मनमाड- गोदावरी एक्सप्रेस पळविण्याचा घाट घातला जात असल्याने मनमाडकरांनी संताप व्यक्त केला आहे . हिंगोलीच्या नागरिकांना मुंबईला जाण्यासाठी सोयीचे व्हावे , यासाठी मनमाड – मुंबई गोदावरी एक्सप्रेस ही हिंगोलीपर्यंत नेण्याची मागणी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे . त्यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना तसे पत्र लिहिले आहे . सध्या गोदावरी एक्सप्रेस ( गाडी नं .१२११७ आणि १२११८ ) कोरोना संकटामुळे दोन वर्षापासून बंद आहे . ती सुरू करण्याची जोरदार मागणी असूनही रल्वे दुर्लक्ष करीत आहे . मनमाडहून सुटणारी गोदावरी एक्सप्रेस मुंबईला जाण्यासाठी मनमाडसह , लासलगाव , निफाड व नाशिक जिल्हा व शहरातील नागरिकांसाठी सोयीची गाडी आहे . गोदावरी एक्सप्रेस हिंगोलीपर्यंत नेऊ नये , अशी मागणी मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रवासीधारकांची आहे . गोदावरी एक्सप्रेस ही पंचवटीप्रमाणेच मनमाडसह जिल्ह्यातील नागरिकांची सोयीची व आवडीची आहे . राज्यराणी एक्सप्रेस मनमाड – मुंबई अशी होती ती जालन्यापर्यंत नेण्यात आली आता जर गोदावरी एक्सप्रेस पळविण्याचा प्रयत्न केला तर आरपीआय ( आठवले ) उग्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेईल , असा इशारा रिपाइंचे नगरसेवक तथा जिल्हाकार्याध्यक्ष गंगाभाऊ त्रिभुवन यांनी दिला आहे . सदर गाडी ही मनमाड स्थानकातून लवकरात लवकर सूरू करावी , अशी मागणी केली आहे .


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.