भारतरत्न, स्वरसम्राज्ञी, गानकोकिळा, जगाचे आश्चर्य, २५००० हुन विविध प्रत्येक भाषेत आपल्या सुमधुर आवाजात गीत गायलेल्या भारताची दीदी…लता मंगेशकर यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी दुःखद निधन झाले. आणि सम्पूर्ण देश स्तब्ध झाला. देश “अखेरचा हा तुला दंडवत….” असे म्हणून दिदीला आज अखेरचा निरोप देत आहे.
दिदींचा आवाज हे जगातील सातवे आश्चर्य आहे “मेरी आवाज ही मेरी पहचान है…!” आणि हा सुवर्ण आवाज कायमच भारतीयांच्या मनात अधिराज्य गाजवत राहील. लता दिदींचे देवाघरी जाणे म्हणजे आज खऱ्या अर्थाने देव श्रीमंत झाला.
सहा दशकांची संगीत साधना आज संपली व संगीत क्षेत्रातील युगाचा आज अंत झाला.
“हम भूल गए रे हर बात, मगर तेरी याद नहीं भुले…”
दिदींना रंगीत खडू माध्यमात फलक रेखाटनातून अश्रूपूर्ण नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली !
– फलक रेखाटन – देव हिरे
(कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव, ता.चांदवड.जि.नाशिक)
1 एप्रिल पासून टोलवर ‘नो कॅश’
टोलनाक्यांवरील मानवी हस्तक्षेप व वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग...











