येवला मतदारसंघ कार्यक्षेत्रात येणाऱ्या मध्य रेल्वेच्या मनमाड – दौंड व मनमाड – हैद्राबाद रेल्वे मार्गावरील भुयारी मार्गात पाणी निचराची व्यवस्था करावी अशी मागणी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना यासंदर्भात त्यांनी पत्रव्यवहार केला आहे. मध्य रेल्वे मार्गावरील पिंपळगाव जलाल व धामोड आणि नगरसुल येथे रेल्वे फाटक होते. रेल्वे प्रशासन ने येथे फाटक काढून अंडरपास मार्ग तयार केले मात्र हे अंडरपास तयार करताना रेल्वे च्या तांत्रिक विभागाने त्यांची व्यवहार्यता न पाहता चुकीचा पद्धतीने बांधकाम केल्याने भुयारी मार्गातून पाणी जाण्याची व्यवस्था नसल्याने पावसाळ्यात या मार्गामध्ये तुडुंब पाणी साचलेले असते व दळणवळण बंद होऊन वाहनधारकांची गैरसोय होते व जनतेला त्रास सहन करावा लागतो.
सेंट झेवियर्स हायस्कूलचा शासकीय चित्रकला परीक्षेचा निकाल शंभर टक्के
मनमाड येथिल सेंट झेवियर्स हायस्कूलचा शासकीय चित्रकला( एलिमेंटरी व इंटरमिजीएट ग्रेड )परीक्षेचा...











