loader image
[ays_poll id=7]

अनारक्षित रेल्वे प्रवासी गाड्यांमध्ये मासिक पासधारक करू शकतील प्रवास

Feb 25, 2022


मासिक पासधारकांना अनारक्षित रेल्वे प्रवासी गाड्यांमध्ये प्रवास करण्यात येणार असल्याचे पत्र रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धीस दिले आहे. मात्र आरक्षित रेल्वे प्रवासी गाड्यांमध्ये सर्वसामान्यांचा प्रवास कधी सुरू होणार याकडे लक्ष लागून आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाने ८ ऑक्टोबर २०२१ रोजी काही वर्गांना काही अटींवर पॅसेंजर रेल्वे गाड्यांमधून प्रवास करण्यास मुभा दिली. त्यात पूर्ण लसीकरण झालेले तसेच सक्षम व अधिकृत वैद्यकिय अधिकार्‍यांचे प्रमाणपत्र असल्यासच मासिक पास धारक ( सिझन तिकीट ) हा प्रवास करता येणार आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या कोविड संदर्भात सर्व अटी हा प्रवास करतांना बंधनकारक राहणार आहेत.

तिकीट खिडकीवरून वितरीत केल्या जाणार्‍या मासिक पास तिकीटांवर फक्त अनारक्षित पॅसेंजर गाड्यांसाठी हे मासिक पास ( सिझन तिकीट )आहे असा शिक्का राहणार आहे. तसेच ज्या मेल एक्सप्रेस गाड्यांना परवानगी असेल त्या गाड्यांचा उल्लेखही त्यावर स्पष्टपणे केला जाणार आहे.

मध्य रेल्वेच्या मनमाड -मुंबई पंचवटी एक्सप्रेससह सर्व डेमू पॅसेंजर ट्रेन्सचा यात समावेश आहे. आता पंचवटीसह भुसावळ-इगतपुरीेमेमू , पुणे पॅसेंजर, अजिंठा एक्सप्रेस, धर्माबाद एक्सप्रेस या गाड्यांमधून प्रवास करण्यास पासधारकांना रेल्वेने प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. मात्र त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील जिव्हाळ्याच्या व प्रवासीप्रिय असलेल्या इतर एक्सप्रेस गाड्या आरक्षित असल्याने या गाड्यांतून यापुढेही रेल्वे पासधारकांना प्रवास करण्यास बंदी राहणार आहे. या गाड्यांतून किंवा इतर आरक्षित डब्यांमधून पासधारकांनी प्रवास केल्यास त्यांच्याकडून दंड वसूल केला जाणार असल्याची माहिती देखील प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.