नांदगाव शहरात गिरणा धरण पाणी योजनेअंतर्गत केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठयामध्ये जिल्हा परिषद तर्फे पाणीपट्टी मध्ये अवास्तव वाढ करण्यात आली असून कोणतेही मीटर न लावता अवाजवी पाणीपट्टी नगरपरिषदेच्या माथी मारण्यात आली आहे.नगर परिषदेने वेळोवेळी वस्तुस्थिती प्रमाणे आकारणी करावी अशी मागणी करूनही त्याकडे हेतुपुरस्सर कानाडोळा करणाऱ्या व गीरणा धरण पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा बंद करणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाचा नांदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांनी निषेध केला असून मा. तहसीलदार यांना निवेदन देऊन पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत करावा अशा आशयाचे निवेदन दिले आहे. गीरणा पनियोजनेअंतर्गत होणारा पाणीपुरवठा अचानक थांबविल्या मुळे शहरातील रहिवाशांवर दहेगाव धरणातील अशुध्द तसेच कोणतीही प्रक्रिया न केलेले दुर्गंधीतीयूक्त पाणी प्यावे लागत आहे.अशुध्द पाण्यामुळे नांदगावकर नागरिकांना मोठ्या प्रमाणात पोटाचे विकार व इतर आजार होत असून तातडीने जिल्हा परिषद आणि नगरपरिषद या दोहोंत समन्वय घडवून योग्य तोडगा काढून शहराला शुद्ध पाणीपुरवठा पुन्हा सुरू करावा, आमदार सुहास अण्णा कांदे आणि मा. जिल्हाधिकारी यांनी याकामी पुढाकार घ्यावा अशी मागणी गुप्ता यांनी सदर निवेदनाद्वारे केली आहे.













