loader image
[ays_poll id=7]

निवडणुकांचे भवितव्य आता सुप्रीम कोर्टाच्या हातात !

Mar 30, 2022


इतर मागासवर्गीयांना आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने विधिमंडळात विशेष कायदा केल्याने निवडणुकीची प्रक्रियाथांबली आहे. त्यामुळे शासन निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात सात याचिका दाखल असून त्या याचिकांवर पुढील आठवड्यापर्यंत सुनावणी होईल. न्यायालयाने राज्य शासनाचा आदेरद्द केल्यास तत्काळ निवडणूका होतील शी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराचा पहिला टप्पा पार करून कायद्यामुळे घरी बसलेल्या अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत

राज्यातील २२ महापालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू सताना र्वोच्च न्यायालयाने इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणावरून राज्य सरकारला फटकारले. ओबीसींचे आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात राजकीय पेच निर्माण झाला होता. त्यामुळे राज्य सरकारने विधिमंडळात कायदा करून निवडणूक आयोगाचे सर्वाधिकार स्वतःकडे घेतले. त्या दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी सुरू करताना प्रभागरचनेचा प्रारूप आराखडादेखील जाहीर केला.

विधिमंडळातील कायद्यामुळे दिवाळीनंतर निवडणुका होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, राज्य विधी मंडळाच्या निर्णयाविरोधात सात याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. यात घटना महत्त्वाची असल्याचे अधोरेखिकरण्याआले त्यावर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे


अजून बातम्या वाचा..

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात...

read more
कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

  नांदगाव: मारुती जगधने येथील प्रसिद्ध कवयित्री,कथा लेखिका यांच्या 'वंशावळीच्या प्राचीन...

read more
.