loader image
[ays_poll id=7]

राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेस पोलिसांनी दिली परवानगी; ह्या असतील टर्म्स अँड कंडिशन्स

Apr 29, 2022


1 मे रोजी राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेच्या अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र ही परवानगी देताना पोलिसांनी काही अटी देखील घातल्या आहेत. या सभेला होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी 16 अटी लागू घाला आहेत. पोलिसांनी या सभेला परवानगी दिल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले आहेत की, पोलिसांनी घातलेल्या अटी व शर्तीचे निश्चितपणे पालन केले जाणार आहे.

सभेला फक्त 15 हजार लोकच जमू शकतील यात एक महत्वाची अट पोलिसांनी घातली आहे. ज्यामध्ये या सभेला फक्त 15 हजार लोकच जमू शकतात, कारण ज्या ठिकाणी ही सभा होणार आहे, त्या सांस्कृतिक क्रीडा मंडळ मैदानाची क्षमता ही 15 हजार लोकांचीच असल्याचं पोलिसांचे म्हणणे आहेत. यावर बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले आहेत की, असं असलं तरी सुद्धा येणाऱ्या लोकांना कोणी थांबू शकत नाही. त्याच प्रमाणे जितकी लोक येथील त्यांना कसं सावरायचं आणि आवरायचं हे पोलिसांच्या मदतीने आम्ही करू, असं ते म्हणाले आहेत. तसेच उद्या मनसेच शिष्ट मंडळ हे या सभे संबंधित औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांची भेट घेणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी बोलता दिली आहे.

या अटींचे करावे लागले पालन

  1. सभा संध्याकाळी 4.30 ते रात्री 21.45 वेळेतच आयोजित करावी, कार्यक्रमात कोणताही बदल करु नये
  2. वंश, जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म यावरुन चिथावणी देणारं विधान करु नये
  3. सभेत कुणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करु नये
  4. सभेसाठी पोलिसांनी दिलेल्या मार्गानेच प्रवास करावा, निर्धारित ठिकाणीच पार्किंग करावं
  5. कार्यक्रमादरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगू नये किंवा प्रदर्शनही करु नये
  6. अट 2, 3 आणि 4 बाबत सभेत सहभागी होणाऱ्यांना आयोजकांनी कळवावे
  7. सभेतील स्वयंसेवकांची नावे, मोबाईल नंबर तसेच बाहेरुन येणाऱ्यांची अंदाजित संख्या एक दिवस अगोदर पोलिसांना कळवावी
  8. सभेसाठी 15 हजारहून अधिक लोकांना निमंत्रिक करु नये, काही गोंधळ झाल्यास आयोजक जबाबदार राहतील
  9. सभास्थानी सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी निर्देशित केलेल्या जागी बॅरिकेट्स उभारावे
  10. सभेसाठी आवाजाची मर्यादा 75 डेसिबल इतकी ठेवावी लागणार
  11. सभेदरम्यान अत्यावश्यक सुविधांना बाधा येणार नाही, याची काळजी घ्यावी.
  12. सभेच्या दिवसी वाहतुकीसंदर्भातील अधिसूचना सभेला येणारे वक्ते, कार्यकर्ते यांना बंधनकारक असेल.
  13. सभेसाठीच्या वस्तू, जनरेटरची व्यवस्था आधीच करावी.
  14. सभेदरम्यान अन्नदान किंवा मिठाई वाटप होणार असेल, तर त्यातून विषबाधा होणार नाही, याची काळजी घ्यावी.
  15. कार्यक्रमाचं ठिकाण किंवा वेळ यामध्ये कोणताही बदल करू नये.

अजून बातम्या वाचा..

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून...

read more
.