loader image
[ays_poll id=7]

मध्यप्रदेशातही होणार ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका : सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश

May 10, 2022


ओबीसी आरक्षणाचं जे महाराष्ट्रात झालं तेच मध्य प्रदेशातही झालं असून स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये तूर्तास ओबीसी आरक्षण लागू होणार नाही. ट्रिपल टेस्टवर आधारित रिपोर्ट सादर करु न शकल्याने सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.
मध्य प्रदेशात भाजपचं सरकार आहे. त्यामुळे तिथे काय निर्णय घेतला जातो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेलं होतं. कारण जर मध्य प्रदेशचा रिपोर्ट मान्य झाला असता तर ट्रिपल टेस्टवर आधारित रिपोर्ट कसा सादर करायचा याचा एक धडा इतर राज्यांना मिळाला असता. पण देशात कुठलंच राज्य आतापर्यंत ट्रिपल टेस्टवर आधारित रिपोर्ट सादर करु शकलेलं नाही.
त्यामुळे आता मध्य प्रदेशातही दोन आठवड्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश सु्प्रीम कोर्टाने दिले आहेत. मध्य प्रदेशात जवळपास २१ हजार पेक्षा जास्त स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणूक प्रलंबित आहे. पाच वर्षांपेक्षा अधिक काळ निवडणूक प्रलंबित ठेवणं हे घटनेला धरुन नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे.
मागच्याच आठवड्यात महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात असाच निकाल सुप्रीम कोर्टाने दिला होता. दोन आठवड्यांत निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. ही प्रक्रिया दोन ते अडीच महिन्यांत पूर्ण होऊन साधारण पावसाळ्यानंतर निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.
आजच्या निकालाने दोन गोष्टी स्पष्ट झाल्यात. एक म्हणजे कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर तातडीने निवडणुका घ्यायला कोर्टानं सांगितलं आहे. दुसरं म्हणजे ट्रिपल टेस्ट पूर्ण नाही, त्यामुळे तूर्तास या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच घेण्याचा कोर्टाचा आदेश आहे. आता निवडणुकांसाठी अवघ्या दोन तीन महिन्यांचा अवधी उरलेला असताना त्याआधी सुप्रीम कोर्टात असा ट्रिपल टेस्टवर आधारित सक्षम रिपोर्ट सादर करणं हा एकमेव पर्याय राज्य सरकारसमोर आहे.

महाराष्ट्र, झारखंड पाठोपाठ आता मध्य प्रदेशातही कोर्टाने ओबीसी आरक्षणाशिवायच निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. आता या सगळ्या प्रकरणात पुढची सुनावणी १२ जुलैला होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत ट्रिपल टेस्टच्या पूर्ततेसाठी काय पावलं उचलली जातात यावर आरक्षणाचं भवितव्य अवलंबून असेल.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये आकांक्षा व्यवहारे ने पटकावली तीन सुवर्णपदके

बघा व्हिडिओ : अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये आकांक्षा व्यवहारे ने पटकावली तीन सुवर्णपदके

नगरोटा हिमाचल प्रदेश येथे सुरू असलेल्या अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये ४५ किलो वजनी गटात ६०...

read more
सराफ सुवर्णकार बांधवांसाठी राज्य शासनाचे आश्वासक पाऊल – आयपीसी 411 अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना

सराफ सुवर्णकार बांधवांसाठी राज्य शासनाचे आश्वासक पाऊल – आयपीसी 411 अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना

राज्यातील सराफ सुवर्णकार बांधव जे सराफी व्यवसाय करतात त्यांच्या सुरक्षेबाबतच्या समस्यांचे निराकरण...

read more
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून साकोरा दगडवाडी व तीन वाड्या वस्ती साठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून साकोरा दगडवाडी व तीन वाड्या वस्ती साठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न

  आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून नांदगाव विधानसभा मतदार संघातील साकोरा ग्रामपंचायत...

read more
नांदगाव विधानसभा मतदार संघातील रणखेडा व बिरोळे येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येकी ५० लाख रुपये किंमतीच्या दोन पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन आमदार सुहास कांदे यांचे पुतणे किरण कांदे यांचे हस्ते आज करण्यात आले.

नांदगाव विधानसभा मतदार संघातील रणखेडा व बिरोळे येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येकी ५० लाख रुपये किंमतीच्या दोन पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन आमदार सुहास कांदे यांचे पुतणे किरण कांदे यांचे हस्ते आज करण्यात आले.

रणखेडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रामवाडी व बिरोळे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सतीचा माता...

read more
मनमाड शहरातील साडे पाच वर्षाची चिमुकली जैनब आत्तार ने कडाक्याच्या उन्हाळ्यात जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला,

मनमाड शहरातील साडे पाच वर्षाची चिमुकली जैनब आत्तार ने कडाक्याच्या उन्हाळ्यात जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला,

  मनमाड :- इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहे. या महिन्यात सर्वच...

read more
.