loader image
[ays_poll id=7]

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांची निवडणूक जाहीर !

May 12, 2022


महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांवरील मतदानाची तारीख जाहीर करण्यात आला आली आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून येत्या १० जूनला मतदान होणार असल्याची शक्यता आहे.उमेदवारांना ३१ मे पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. राजकीयदृष्ट्या ही निवडणूक फार महत्त्वाची मानली जात आहे. या निवडणुकीसाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती अपक्ष लढणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे. यामुळे संभाजीराजेंचे आव्हान एका जागेसाठी राहणार आहेत.
महाराष्ट्रातील ६ खासदारांचा राज्यसभेवरील कार्यकाळ ३ मे रोजी संपु्ष्टात आला आहे. यामध्ये संजय राऊत, प्रफुल पटेल, पी.चिदंबरम, पियूष गोयल, विनय सहस्रबुद्धे, विकास महात्मे यांची मुदत संपली आहे. मुदत संपलेल्या खसादारांपैकी ३ खासदार भाजपचे तर ३ खासदार महाविकास आघाडीचे आहेत. यातील भाजपकडून राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून संभाजीराजे छत्रपती यांना संधी देण्यात आली होती. परंतु संभाजीराजेंनी एकला चलोची भूमिका घेतल्यामुळे ते अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. राज्यसभेच्या या ६ रिक्त जागा तात्काळ भरुन काढण्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १५ राज्यातील ५७ राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामधील महाराष्ट्रातील ६ जागा आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आणि भाजप खासदारांनी निवड बिनविरोध करण्याची शक्यता आहे. परंतु निवडणूक घेण्याची वेळ आली तर १० जूनला मतदान होऊ शकते.

शिवसेनेकडून संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफूल्ल पटेल, काँग्रेसकडून पी.चिदंबरम यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यात येणार आहे. तर भाजपकडून पीयूष गोयल केंद्रीय मंत्री असल्यामुळे पुन्हा राज्यसभेवर जाऊ शकतात तर विनय सहस्त्रबुद्धे यांना पुन्हा संधी देण्यात येऊ शकते.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.