ओबीसी आरक्षणसाठी सरकारची बाजू मांडण्यास महविकास आघाडी सरकार हे अपयशी ठरले असून ओबीसी आरक्षण न मिळण्यासाठी महाराष्ट्रातील नाकर्ते महाविकास आघाडी सरकारच् जबाबदार आहे, हे मध्यप्रदेश च्या निकालावरून स्पष्ट झाले आहे त्यामुळे ठाकरे सरकारच्या
नाकर्तेपणामुळे गेलेले आरक्षण पुन्हा मिळावे या प्रमुख मागणीसाठी आणि नाकर्त्या राज्यशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी येवला येथे प्रदेश महामंत्री शंकरराव वाघ, जिल्हा अध्यक्ष संजयभाऊ शेवाळे,जिल्हा महामंत्री संजय सानप यांचे नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आला. यावेळी भाजपा obc मोर्चा,युवा मोर्चा,महिला मोर्चा,पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
शंकरराव वाघ,संजय शेवाळे, संजू सानप, प्रमोद सस्कर,तरंग गुजराथी,सुनील काटवे,केदारनाथ वेळजकर,सुधाकर पाटोळे,आनंद शिंदे, मनोज दिवटे,बापू गाडेकर,कुणाल क्षीरसागर,मयुर मेघराज, मनीषा कुलकर्णी, रत्ना गवळी, रुपाली खोडवे,रमेश आहेर, अशोक पेंढारकर, गोविद सानप, मुत्ताक शेख, कुणाल भावसार,कुंदन हजारे,संतोष काटे,अक्षय कुलकर्णी आदी उपस्थित होते.












