loader image
[ays_poll id=7]

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात

May 30, 2022


अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली असून ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि भाग एक आजपासून भरता येणार आहे.

मुंबई महानगर, पुणे , पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर या विभागांमध्ये अकरावी ऑनलाइन प्रवेशाची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे.

प्रत्यक्ष अर्ज नोंदणी आणि अर्जाचा भाग एक भरण्यासाठी आजपासून सुरुवात होईल. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करून लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळवायचा आहे. तसेच अकरावी प्रवेशाचा भाग 1, ऑनलाइन शुल्क आणि अर्ज प्रमाणित करण्यासाठी मार्गदर्शक केंद्र निवडायचं आहे. तर दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांनी आपला पसंती क्रमांक देऊन अर्जाचा भाग-2 भरायचा आहे.
विद्यार्थ्यांनी https://11thadmission.org.in/

या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करून त्यानंतर लॉग इन आयडी आणि पासवर्ड तयार करायचा आहे. लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करून इयत्ता ११वी प्रवेशासाठीच्या अर्जाचा भाग १ भरायचा आहे. ऑनलाईन शुल्क भरून फॉर्म लॉक करावयाचा आहे.

अर्ज प्रमाणित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केंद्र निवडायचे आहे. मार्गदर्शन केंद्र किंवा माध्यमिक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी आपला अर्ज प्रमाणित करून घ्यायचा आहे.

प्रत्यक्ष अर्ज नोंदणी आणि भाग 1 भरण्याचं वेळापत्रक 30 मे 2022 पासून:

  1. ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि प्रवेश अर्ज 1 भरणं, अर्ज प्रमाणित करणे (ऑनलाईन अर्ज करून विद्यार्थ्यांनी लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळविणे तसेच अकरावी प्रवेशाचा भाग 1 भरणं, ऑनलाईन शुल्क भरणं, अर्ज प्रमाणित करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रं निवडणे.
  2. विद्यार्थ्यांनी भरलेल्या माहितीचा अर्ज तपासून प्रमाणित करणं 30 मे 2022 पासून ते राज्य मंडळाच्या निकालापर्यंत.
  3. उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी आपली माहिती तपासून अंतिम करणे.
  4. शिक्षण उपसंचालकांनी शाळा / कनिष्ट महाविद्यालयांची माहिती तपासून द्यावी.
  5. दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग 2 भरून प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांची पसंतीक्रम नोंदविणं तसेच कोटांतर्गत राखीव जागेवरील प्रवेशासाठी पसंतीची महाविद्यालये निवडणे आणि ऑनलाईन नमूद करणे.

अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.