आज पार पडलेल्या राज्यसभा निवडणूकीत महाविकास आघाडीची सर्व मते वैध ठरली असून ना.ठाकूर,ना.आव्हाड आणि आमदार कांदे यांच्या मतांवरील आक्षेप निवडणूक अधिकाऱ्याने फेटाळला. ही तिन्ही मते बाद करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली होती. आव्हाड यांनी आपली मत पत्रिका जयंत पाटील यांच्या हातात दिली तसेच ना.ठाकूर आणि आमदार कांदे यांनी आपआपली मत पत्रिका आपल्या एजंटला दाखविली असल्याचा आरोप करत ही मते बाद करण्यात यावी अशी मागणी भाजपने केली होती.
नाशिक विभागीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंचे वर्चस्व १५ खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...









