राज्यात विधान परिषद निवडणुकीनंतर झालेल्या राजकीय भूकंपाने आघाडी सरकार जाणार की राहणार हा महत्वाचा प्रश्न असून शिवसेनेकडून अजूनही आमदारांना परत येण्याची साद घातली जात आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या गटाची संख्या हळू हळू वाढतच आहे. तब्बल तीन दिवसाच्या प्रतीक्षेनंतर कृषी मंत्री दादा भुसे अखेर एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामील झाले.काल सकाळ पासूनच नॉट रिचेबल असलेले भुसे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वच शिवसैनिकांचे लक्ष लागून होते.अखेर काल संध्याकाळी दादा भुसे, माजी मंत्री संजय राठोड व रविंद्र फाटक गुवाहाटी येथे जाऊन शिंदे गटात सामील झाले.
जिल्हा परिषदेच्या निवडणुका अजून लांबणीवर पडण्याची शक्यता ?
काही वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार...











